शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

"सर्वांचे केंद्र केवळ दिल्लीच का, देशाला चार राजधान्या हव्यात"; ममता बॅनर्जींची मागणी

By देवेश फडके | Published: January 23, 2021 3:34 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळीच मागणी केली आहे. देशाची एकच राजधानी असण्यावर त्यांनी आक्षेप घेतला असून, देशाला किमान चार राजधान्या हव्यात, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अजब मागणीदेशाला चार राजधान्या असायला हव्यात - ममता बॅनर्जीनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळीच मागणी केली आहे. देशाची एकच राजधानी असण्यावर त्यांनी आक्षेप घेतला असून, देशाला किमान चार राजधान्या हव्यात, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

कोलकातामधील श्याम बाजार येथे एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शंखनाद करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यानंतर जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भारतात किमान चार रोटेटिंग राजधान्या असायला हव्यात. इंग्रजांनी कोलकाता येथे बसून संपूर्ण देशावर राज्य केले. देशात एकच राजधानी का आहे?, असा प्रश्नही ममता बॅनर्जी यांनी यावेळी उपस्थित केला. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली. त्यावेळी त्यात गुजरात, बंगाल, तामिळनाडू या भागातील लोकांनीही सहभाग घेतला. फोडा आणि राज्य करा, याचा नेताजी नेहमी विरोध करायचे. बंगलाच्या भावना बाहेरील व्यक्ती समजून घेऊ शकत नाही, असे सांगत भारतीय जनता पक्ष (भाजप) इतिहास बदलण्याचा विचार करत आहे. नेता तोच असतो, जो सर्वांना सोबत घेऊन जातो, असे मत ममता बॅनर्जी यांनी यावेळी व्यक्त केले. 

नवीन पीढीला नेताजींबाबत अधिक माहिती नाही. नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलले गेले पाहिजे. नेताजी आमच्यासाठी देशनायक आहेत. निवडणुका जवळ आल्यानंतर भाजपला पश्चिम बंगालची आठवण झाली, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस