शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

खोटे बोलणाऱ्या मोदींचे तोंड सर्जिकल टेप लावून बंद केले पाहिजे, ममता बॅनर्जींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:50 IST

भाजपा नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सातत्याने शाब्दीक चकमकी उडत आहे.

नागराकाटा (पश्चिम बंगाल) - गेल्या काही वर्षांमध्ये बंगालच्या राजकारणात एकछत्री अंमल प्रस्थापित करणाऱ्या ममता बॅनर्जींसमोर यावेळी भाजपाने जोरदार आव्हान उभे केले आहे. त्यामुळे भाजपा नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सातत्याने शाब्दीक चकमकी उडत आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ''मोदींना सत्ता आणि राजकारणातून दूर केले पाहिजे. तसेच त्यांचे तोंड चिटकणाऱ्या सर्जिकल टेपने बंद करून टाकले पाहिजे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.  ''पाच वर्षांच्या कार्यकाळापैकी साडे चार वर्षे नरेंद्र मोदी जगभ्रमंतीच करण्यात गुंतले होते. त्यामुळे शेतकरी आणि मध्यमवर्गाच्या समस्यांकडे लक्ष देण्यासांनी मोदींना वेळ मिळाला नाही. आता निवडणुका जवळ आल्याने मोदी प्रत्येकाला घाबरवत आहेत, धमकावत आहेत, खोटे बोलत आहेत. जर खोटं बोलण्याची स्पर्धा आयोजित केली गेली, त्यात नरेंद्र मोदींना पहिले बक्षीस मिळेल, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला.  ''मोदींना खोटे बोलता येऊ नये म्हणून यावेळच्या निवडणुकीत जनता नरेंद्र मोदींच्या ओठांना ल्युकोप्लास्ट लावून ते चिकटून टाकतील. देशहिताच्या दृष्टीने मोदींना केवळ पंतप्रधानपदच नव्हे तर राजकारणातूनही बाहेर करणे आवश्यक आहे.'' असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच मोदींनी मला धमक्या देऊ नयेत, तसे करणे ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरेल, अशा इशाराही त्यांनी दिला.  ''मोदींनी पाच वर्षांच्या कार्यकाळातील साडे चार वर्षए जग फिरण्यात घालवली. जेव्हा देशात शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा मोदी काय करत होते. जेव्हा नोटामंदीमुळे लोक मरत होते तेव्हा मोदी काय करत होते. जेव्हा कोट्यवधी लोक आपल्या नोकऱ्या गमवत होते. तेव्हा मोदी काय करत होते, अशा सवालांच्या फैरी ममता बॅनर्जी यांनी मोदींवर झाडल्या.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिकाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019