शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

ममतांचा मोदी सरकारला 'पाठिंबा'; अमित शहांच्या प्रस्तावाला चक्क हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 19:05 IST

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये वाक्युद्ध पाहायला मिळाले होते.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात राज्यसभेमध्ये अनेक विधेयके मंजूर झाली नाहीत. कारण राज्यसभेत विरोधकांची संख्या जास्त होती. मात्र, दुसऱ्या कार्यकाळात हे चित्र पालटल्याचे दिसत आहे. आज राज्यसभेत मोदी सरकारच्या दोन विधेयकांना ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. ममता-शहा वादानंतर टीएमसीच्या या पावलामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये वाक्युद्ध पाहायला मिळाले होते. शारदा चीटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलिस महासंचालकांवर कारवाईसाठी सीबीआयचे अधिकारी पोहोचले होते. त्यानंतरचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वाद, लोकसभेवेळी शहा यांनी उघडलेला मोर्चा, शहांच्या रॅलीवेळी झालेला वाद आदी मुद्द्यांमुळे मोदी आणि ममता यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मोदींनी रॅलीवेळी ममता कुर्ता पाठवत असल्याचे सांगितले होते. तेव्हा ममतांनी मातीचे लाडू खायला घालण्याचे सांगितले होते. एवढ्या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर ममतांच्या पक्षाने राज्यसभेत मोदींना पाठिंबा देणे आश्चर्याचे मानले जात आहे. 

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, याचा प्रत्यय राज्यसभेत आल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नुकताच जम्मू काश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी तेथील राष्ट्रपती राजवटीचा काळ सहा महिन्यांनी वाढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेगच संसदेत मंजुरीही मिळविली होती. मात्र, राज्यसभेची मंजुरी मिळणे गरजेचे होते. राज्यसभेत सध्या विरोधकांचेच संख्याबळ जास्त आहे. यामुळे ट्रिपल तलाक सारखे विधेयक रेंगाळले आहे. यामुळे विरोधकांचा पाठिंबा मिळविणे भाजपला कठीण जाणार होते. 

शहा यांनी जम्मू आणि काश्मीर आरक्षण अधिनियम 2004 चे दुरुस्ती विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडले. याआधी शुक्रवारी दोन्ही प्रस्ताव लोकसभेत मांडण्यात आले होते. तेथे बहुमताने हे प्रस्ताव मंजूर झाले होते. राज्यसभेत या विधेयकाला समाजवादी पार्टी आणि बिजू जनता दलाने पाठिंबा दिला होता. मात्र, ममता बॅनर्जींच्या टीएमसी सदस्यांनीही पाठिंबा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभार प्रदर्शनावेळी राज्यसभेत सदस्यांना आवाहन केले होते. जनतेचा जनादेश विधेयकांना मंजुरी देण्यात अडचणी आणून दाबून टाकू नये, असे मोदी म्हणाले होते.   

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालRajya Sabhaराज्यसभा