शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय मागे घ्या, ममता बॅनर्जी यांची पंतप्रधानांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:41 AM

त्रिपुरामधील भाजपचे सरकार आपल्या विरोधकांना त्रास देत आहे, निवडणूक काळात विरोधी पक्षांना प्रचारही करायला देत असून, नेत्यांना काही कारण नसताना अटक केली जात आहे, ही बाबही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली.

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाचे विविध राज्यांतील कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय राज्यांच्या अधिकारांवर अन्याय करणारा असून, तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. मध्यंतरी केंद्र सरकारने सीमेवरील राज्यांतील सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला होता. कायदा व सुव्यवस्था ही राज्यांची जबाबदारी आहे. आतील क्षेत्र वाढवल्याने पोलिसांच्या म्हणजेच पर्यायाने राज्यांच्या अधिकारांवर गदा आल्याचे ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना सांगितले.  त्रिपुरामधील भाजपचे सरकार आपल्या विरोधकांना त्रास देत आहे, निवडणूक काळात विरोधी पक्षांना प्रचारही करायला देत असून, नेत्यांना काही कारण नसताना अटक केली जात आहे, ही बाबही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली. तृणमूल काँग्रेसच्या सायली घोष यांनाही त्रिपुरा सरकारने अटक केल्याबद्दल ममता यांनी नाराजीही व्यक्त केली. 

पवार व ठाकरे यांनाही भेटणारममता बॅनर्जी म्हणाल्या की, आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार आहोत. ममता बॅनर्जी मध्यंतरी गोव्यात गेल्या होत्या. दोन दिवस दिल्लीत होत्या. आता त्या विविध राज्यांत जाणार असून, विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी तेथील विरोधी नेत्यांना भेटणार आहेत. पवार व ठाकरे यांना त्या त्याच संदर्भात भेटणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीTripuraत्रिपुराwest bengalपश्चिम बंगाल