शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जीच लागू देणार नाहीत भाजपला गळती? दीदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 15:37 IST

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले अनेक नेते तृणमूलमध्ये घरवापसी करण्याच्या विचारात

कोलकाता: पश्चिम बंगालची सत्ता राखत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं हॅटट्रिक केली. बंगाल जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यभर सभा घेतल्या. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं. मात्र तरीही तृणमूलनं सत्ता राखली. त्यामुळे आता सर्व चक्रं उलटी फिरू लागली आहेत. तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र त्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी करू इच्छिणाऱ्या नेत्यांमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, शमिक भट्टाचार्य, राजीव बॅनर्जी, सोनाली गुहा, दिपेंदू विश्वास यांच्यासह अनेक नेते तृणमूलमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. भाजपचे तब्बल ३० हून अधिक आमदार तृणमूलमध्ये येऊ इच्छितात. विशेष म्हणजे निवडणुकीआधी जवळपास इतक्याच आमदारांनी तृणमूलची साथ सोडली होती. तृणमूलनं सत्ता राखल्यानं नेते घरवापसीच्या तयारीत असले, तरी पक्षाच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या तरी या नेत्यांना पुन्हा पक्ष प्रवेश देण्याच्या मनस्थितीत नाहीत. आता बंगालबाहेरही मोदींना टक्कर देणार दिदी; पक्षाचं नाव बदलण्यासंदर्भात सुरू आहे रणनीती!तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तृणमूलची पुन्हा सत्ता आल्यानंतर या नेत्यांना त्यांची चूक जाणवली आहे. पाच वर्ष विरोधात राहून संघर्ष करण्यापेक्षा स्वगृही परतण्याचा विचार या नेत्यांकडून सुरू आहे. मात्र या घरवापसीसाठी ममता फारशा अनुकूल नाहीत. त्यामुळे उघड नाराजी व्यक्त केलेल्या नेत्यांना भाजपमध्येच राहावं लागू शकतं. तृणमूल सोडून गेलेल्या नेत्यांच्या घरवारसीचा निर्णय ममता बॅनर्जीच घेतील, अशी माहिती पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी दिली.बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शनन्यूज १८ इंडियानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा प्रवेश देण्याच्या मनस्थितीत नाही. यासाठी ममतांना कोणतीही घाई नाही. 'पक्ष अडचणीत असताना, संकटांचा सामना करत असताना साथ सोडून जाणाऱ्यांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. पक्ष सोडून जाणाऱ्या अनेकांनी नेतृत्त्वाला ब्लॅकमेल केलं होतं. अशा नेत्यांना पुन्हा पक्षात घेतल्यास पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते,' अशी माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१