शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

ममता बॅनर्जीच लागू देणार नाहीत भाजपला गळती? दीदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 15:37 IST

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले अनेक नेते तृणमूलमध्ये घरवापसी करण्याच्या विचारात

कोलकाता: पश्चिम बंगालची सत्ता राखत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं हॅटट्रिक केली. बंगाल जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यभर सभा घेतल्या. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं. मात्र तरीही तृणमूलनं सत्ता राखली. त्यामुळे आता सर्व चक्रं उलटी फिरू लागली आहेत. तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र त्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी करू इच्छिणाऱ्या नेत्यांमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, शमिक भट्टाचार्य, राजीव बॅनर्जी, सोनाली गुहा, दिपेंदू विश्वास यांच्यासह अनेक नेते तृणमूलमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. भाजपचे तब्बल ३० हून अधिक आमदार तृणमूलमध्ये येऊ इच्छितात. विशेष म्हणजे निवडणुकीआधी जवळपास इतक्याच आमदारांनी तृणमूलची साथ सोडली होती. तृणमूलनं सत्ता राखल्यानं नेते घरवापसीच्या तयारीत असले, तरी पक्षाच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या तरी या नेत्यांना पुन्हा पक्ष प्रवेश देण्याच्या मनस्थितीत नाहीत. आता बंगालबाहेरही मोदींना टक्कर देणार दिदी; पक्षाचं नाव बदलण्यासंदर्भात सुरू आहे रणनीती!तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तृणमूलची पुन्हा सत्ता आल्यानंतर या नेत्यांना त्यांची चूक जाणवली आहे. पाच वर्ष विरोधात राहून संघर्ष करण्यापेक्षा स्वगृही परतण्याचा विचार या नेत्यांकडून सुरू आहे. मात्र या घरवापसीसाठी ममता फारशा अनुकूल नाहीत. त्यामुळे उघड नाराजी व्यक्त केलेल्या नेत्यांना भाजपमध्येच राहावं लागू शकतं. तृणमूल सोडून गेलेल्या नेत्यांच्या घरवारसीचा निर्णय ममता बॅनर्जीच घेतील, अशी माहिती पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी दिली.बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शनन्यूज १८ इंडियानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा प्रवेश देण्याच्या मनस्थितीत नाही. यासाठी ममतांना कोणतीही घाई नाही. 'पक्ष अडचणीत असताना, संकटांचा सामना करत असताना साथ सोडून जाणाऱ्यांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. पक्ष सोडून जाणाऱ्या अनेकांनी नेतृत्त्वाला ब्लॅकमेल केलं होतं. अशा नेत्यांना पुन्हा पक्षात घेतल्यास पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते,' अशी माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१