शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

ममता बॅनर्जींना गंभीर दुखापत, घात की अपघात? या ५ प्रश्नांनी वाढवलं घटनेचं गुढ, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 5:53 PM

Mamata Banerjee News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या ममता बॅनर्जी यांना राहत्या घरी झालेल्या दुखापतीबाबत काही प्रश्न उपस्थित होत असून, त्या प्रश्नांमुळे या संपूर्ण प्रकरणाबाबतचं गुढ वाढलं आहे.   

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काल राहत्या घरी गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारांसाठी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्या डोक्याला चार टाके घालावे लागले आहेत. उपचारांनंतर ममता बॅनर्जी यांना घरी पाठवण्यात आले. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्रिपदी असलेल्या ममता बॅनर्जी यांना राहत्या घरी झालेल्या दुखापतीबाबत काही प्रश्न उपस्थित होत असून, त्या प्रश्नांमुळे या संपूर्ण प्रकरणाबाबतचं गुढ वाढलं आहे.   

मुख्यमंत्र्यांना रहस्यमय परिस्थितीमध्ये दुखापत झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास कुरू केला आहे. पोलीस मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणाऱ्या येणाऱ्यांची यादी तयार करत आहेत. या प्रकरणी सखोल तपास झाल्यानंतरच सत्य समोर येणार आहे. मात्र तोपर्यंत काही प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक बनलं आहे.  यात पाच प्रमुख प्रश्न उपस्थित होत आहेत. ते पुढीलप्रमाणे.

१ - ही घटना घडली तेव्हा ममता बॅनर्जी एकट्या नव्हत्या. त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. ते सुद्धा ममता बॅनर्जींसोबत घरात फिरत होते. ममता बॅनर्जी या पाठीमागून धक्का लागल्याने पडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा अपघात होता की हल्ला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  २ - ममता बॅनर्जी यांच्यासोबत फिरत असलेली व्यक्ती चालता चालता अडखळून त्यांच्यावर पडली की, कुणी हल्लेखोर होता तो सुरक्षा व्यवस्था भेदून घरामध्ये कसा पोहोचला?३ - मुख्यमंत्री असल्याने ममता बॅनर्जी यांच्याकडे झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र ज्या प्रकारे मागून धक्का दिला गेला, असं ममता बॅनर्जींनी पोलीस आयुक्तांसमोर सांगितलं आहे, त्यामुळे सुरक्षेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.  ४ - ममता बॅनर्जी यांना दुखापत झाल्याची माहिती रुग्णालयाबरोबरच तृणमूल काँग्रेसकडून समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जखमी झालेल्या ममता बॅनर्जी यांचा व्हिडीओ शेअर केला होता. मात्र त्यानंतर या घटनेबाबत कुठलीही अधिकची माहिती देण्यात आलेली नाही. ५ - सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या घारामध्ये हल्लेखोर कसे घुसले आणि त्यांना धक्का देऊन कसे निघून गेले हा आहे. या दरम्यान, कुटुंबीयांचं सर्व लक्ष ममता बॅनर्जी यांच्यावरच होतं, असं मानलं तरी, हल्लेखोर सुरक्षा रक्षकांच्या नजरेत का आला नाही, हाही प्रश्न उपस्थित होतो. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल