शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय ममता बॅनर्जी, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाविरोधात लढण्यास तयार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 20:31 IST

abhishek banerjee : आम्ही त्रिपुरा आणि आसामला पोहोचलो आहोत आणि आता आम्ही गोव्यालाही जाऊ. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पंतप्रधान मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

नवी दिल्ली : टीएमसी (TMC) खासदार आणि पार्टीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी रविवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केवळ बंगालच नाही तर इतर राज्येही येत्या काळात विजयाची नोंद करतील. सध्या टीएमसी हा एकमेव पक्ष आहे, जो बाहेरील लोकांसमोर न झुकता संपूर्ण ताकदीने लढाई लढत आहे. आम्ही त्रिपुरा आणि आसामला पोहोचलो आहोत आणि आता आम्ही गोव्यालाही जाऊ. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पंतप्रधान मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्रीपदावर राहण्यासाठी त्यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जींनी भवानीपूरच्या जग्गु बाजारात प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, सध्या अशी अनेक राज्ये आहेत जी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाविरोधात लढण्यास तयार आहेत. तृणमूल काँग्रेस बंगालपुरती मर्यादित राहणार नाही. ही पार्टी राष्ट्रीय स्तरावर स्वतःचा विस्तार करेल, असे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले. भाजपाकडे बोट दाखवत ते म्हणाले की, लवकरच आपण गोव्यालाही जाऊ, म्हणून स्वतःला तयार करा कारण आम्ही राजकीय लढाई करण्यास तयार आहोत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इटलीमधील रोममध्ये होणाऱ्या जागतिक शांतता परिषदेसाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे टीएमसी खासदारांकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. यातच, अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, जागतिक शांतता परिषदेसाठी ममता बॅनर्जींना विशेष आमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यांना जाऊ देण्यात आले नाही. कारण त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. यासोबतच त्यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवरही निशाणा साधला. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, तुम्ही यावेळी उत्तर प्रदेशची स्थिती पाहा. भाजपा सध्या तालिबानच्या शैलीत राज्य करत आहे. नागरिकांना स्वातंत्र्य नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सर्वकाही ठरवत आहेत.

आम्ही शिष्टाचार आणि शिस्त राखण्यासाठी परवानगी मागितली - ममता बॅनर्जीजागतिक शांतता परिषदेसाठी रोमला जाण्यासाठी परवानगी मिळाली नसल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, अनेक राज्य परदेशात जाण्याची परवानगी घेत नाहीत, परंतु आम्ही शिष्टाचार आणि शिस्त राखण्यासाठी परवानगी मागितली होती. तो मला गप्प बसवू शकत नाही. यापूर्वीही मला शिकागो, केंब्रिज, चीन आणि सेंट स्टीफन्सच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्यापासून रोखण्यात आले होते. याचबरोबर, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही 30 वर्षे सीपीएमशी लढलो. मी काँग्रेस सोडली होती कारण त्यांनी सीपीएम बरोबर भागीदारी केली होती, जी अजूनही चालू आहे. त्यांचा भाजपासोबत करारही आहे. आम्ही भाजपाला देशातून हद्दपार करण्याचे वचन देतो. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी