शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

ममतांचे एकला ‘खेला होबे’! जागावाटपावरून बिनसले, ‘इंडिया’ आघाडीला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 07:27 IST

पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र लढणार तृणमूल काँग्रेस

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात एकट्याने उतरण्याचा निर्णय घेतल्याचे बुधवारी जाहीर केले. काँग्रेसनेही निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिल्याने विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसला जागावाटपाचा प्रस्ताव दिला होता. पण, त्यांनी तो नाकारला. आमच्या पक्षाने आता बंगालमध्ये एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेस आणि टीएमसी यांच्यातील जागावाटपाच्या वादात बॅनर्जी म्हणाल्या. जागावाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेसमधील कोणाशीही बोलले नाही. पक्षाचा राज्यात काँग्रेसशी कोणताही संबंध नाही, असेही बॅनर्जी यांनी सांगितले. टीएमसीने २०१९च्या लोकसभा  निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे काँग्रेसला २ जागांची ऑफर दिल्याने त्यांच्यात तणाव निर्माण झाला. माकपच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी, काँग्रेस आणि टीएमसी हे २८ पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहेत. 

भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण नाही : ममता 

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे आम्हाला निमंत्रण देण्यात आले नाही. या आरोपानंतर काँग्रेसने म्हटले आहे की, १३ जानेवारी रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी स्वतंत्रपणे ममता बॅनर्जी यांना भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण दिले होते.  राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतही तसा उल्लेख केला होता.

आम्ही स्वबळावर लढू : अधीर रंजन चौधरीपश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संधिसाधू आहेत, त्यांच्या दयेवर आम्ही निवडणूक लढवणार नाही. स्वबळावर निवडणुका कशा लढवायच्या हे काँग्रेसला माहीत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये २०११ मध्ये काँग्रेसच्या दयेने ममता स्वत: पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या होत्या, अशी भूमिका चौधरी यांनी स्पष्ट केली.

पंजाबमध्ये आप स्वबळावर लढणार पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही स्पष्ट केले की, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढेल. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोघांचेही मत आहे की, सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याने आघाडीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पंजाबमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. केरळमध्येही अशीच स्थिती डावे आणि काँग्रेसची आहे. तिथे डावे पक्ष सत्तेत आणि काँग्रेस विरोधात आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेस