शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ममतांचे एकला ‘खेला होबे’! जागावाटपावरून बिनसले, ‘इंडिया’ आघाडीला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 07:27 IST

पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र लढणार तृणमूल काँग्रेस

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात एकट्याने उतरण्याचा निर्णय घेतल्याचे बुधवारी जाहीर केले. काँग्रेसनेही निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिल्याने विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसला जागावाटपाचा प्रस्ताव दिला होता. पण, त्यांनी तो नाकारला. आमच्या पक्षाने आता बंगालमध्ये एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेस आणि टीएमसी यांच्यातील जागावाटपाच्या वादात बॅनर्जी म्हणाल्या. जागावाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेसमधील कोणाशीही बोलले नाही. पक्षाचा राज्यात काँग्रेसशी कोणताही संबंध नाही, असेही बॅनर्जी यांनी सांगितले. टीएमसीने २०१९च्या लोकसभा  निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे काँग्रेसला २ जागांची ऑफर दिल्याने त्यांच्यात तणाव निर्माण झाला. माकपच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी, काँग्रेस आणि टीएमसी हे २८ पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहेत. 

भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण नाही : ममता 

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे आम्हाला निमंत्रण देण्यात आले नाही. या आरोपानंतर काँग्रेसने म्हटले आहे की, १३ जानेवारी रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी स्वतंत्रपणे ममता बॅनर्जी यांना भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण दिले होते.  राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतही तसा उल्लेख केला होता.

आम्ही स्वबळावर लढू : अधीर रंजन चौधरीपश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संधिसाधू आहेत, त्यांच्या दयेवर आम्ही निवडणूक लढवणार नाही. स्वबळावर निवडणुका कशा लढवायच्या हे काँग्रेसला माहीत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये २०११ मध्ये काँग्रेसच्या दयेने ममता स्वत: पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या होत्या, अशी भूमिका चौधरी यांनी स्पष्ट केली.

पंजाबमध्ये आप स्वबळावर लढणार पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही स्पष्ट केले की, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढेल. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोघांचेही मत आहे की, सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याने आघाडीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पंजाबमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. केरळमध्येही अशीच स्थिती डावे आणि काँग्रेसची आहे. तिथे डावे पक्ष सत्तेत आणि काँग्रेस विरोधात आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेस