शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

केंद्राला २.५ लाख शेतकऱ्यांची नावे पाठवली, अद्याप निधी आला नाही; ममता बॅनर्जींचा पलटवार

By देवेश फडके | Updated: February 8, 2021 19:08 IST

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका करत किसान सन्मान योजनेचा निधी अद्याप आला नसल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देकिसान सन्मान योजनेचा निधी केंद्राकडून मिळाला नाही - ममता बॅनर्जीकेंद्राला अडीच लाख शेतकऱ्यांची नावे पाठवली - ममता बॅनर्जीभाजपच्या आरोपांवर ममता बॅनर्जी यांचा पलटवार

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस राजकारण तापत असल्याचे दिसून येत आहे. तृणणूल काँग्रेस, भारतीय जनता पक्ष (भाजप) अनेक मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका करत किसान सन्मान योजनेचा निधी अद्याप आला नसल्याचा दावा केला आहे. (Mamata Banerjee criticized Central govt over pm kisan nidhi)

ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, राज्य सरकारकडून केंद्र सरकारला २.५ शेतकऱ्यांची नावे पाठवली होती. मात्र, अद्यापही पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी राज्याला मिळाला नाही. केंद्राकडून राज्य सरकारला सहा लाख अर्ज पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी २.५ लाख अर्ज शेतकऱ्यांचे आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी नमूद केले. 

रिपाइं पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लढवणार; रामदास आठवलेंची घोषणा

पश्चिम बंगालमधील कृषक बंधू योजनेतील निधी वाढवून सहा हजार रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी या योजनेच्या माध्यमातून ५ हजार रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम एक हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. राज्यात १९ औद्योगिक प्रकल्पांची सुरुवात केली जाईल. यासाठी सुमारे ७२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यातून ३.२९ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. विधानसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी ही माहिती दिली. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना हल्दिया येथील सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी सरकार आणि तृणमूल काँग्रेसवर टीका केली होती. ममता बॅनर्जी सरकार आयुषमान भारत आणि पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना तसेच स्थानिकांना मिळू देत नाही, असा आरोप केला होता. पश्चिम बंगालचे सरकार आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन या दोन्ही योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना दिले होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा