शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राला २.५ लाख शेतकऱ्यांची नावे पाठवली, अद्याप निधी आला नाही; ममता बॅनर्जींचा पलटवार

By देवेश फडके | Updated: February 8, 2021 19:08 IST

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका करत किसान सन्मान योजनेचा निधी अद्याप आला नसल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देकिसान सन्मान योजनेचा निधी केंद्राकडून मिळाला नाही - ममता बॅनर्जीकेंद्राला अडीच लाख शेतकऱ्यांची नावे पाठवली - ममता बॅनर्जीभाजपच्या आरोपांवर ममता बॅनर्जी यांचा पलटवार

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस राजकारण तापत असल्याचे दिसून येत आहे. तृणणूल काँग्रेस, भारतीय जनता पक्ष (भाजप) अनेक मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका करत किसान सन्मान योजनेचा निधी अद्याप आला नसल्याचा दावा केला आहे. (Mamata Banerjee criticized Central govt over pm kisan nidhi)

ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, राज्य सरकारकडून केंद्र सरकारला २.५ शेतकऱ्यांची नावे पाठवली होती. मात्र, अद्यापही पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी राज्याला मिळाला नाही. केंद्राकडून राज्य सरकारला सहा लाख अर्ज पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी २.५ लाख अर्ज शेतकऱ्यांचे आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी नमूद केले. 

रिपाइं पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लढवणार; रामदास आठवलेंची घोषणा

पश्चिम बंगालमधील कृषक बंधू योजनेतील निधी वाढवून सहा हजार रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी या योजनेच्या माध्यमातून ५ हजार रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम एक हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. राज्यात १९ औद्योगिक प्रकल्पांची सुरुवात केली जाईल. यासाठी सुमारे ७२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यातून ३.२९ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. विधानसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी ही माहिती दिली. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना हल्दिया येथील सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी सरकार आणि तृणमूल काँग्रेसवर टीका केली होती. ममता बॅनर्जी सरकार आयुषमान भारत आणि पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना तसेच स्थानिकांना मिळू देत नाही, असा आरोप केला होता. पश्चिम बंगालचे सरकार आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन या दोन्ही योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना दिले होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा