शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपविराेधात आघाडीचे ममतांचे पुन्हा प्रयत्न; विराेधी पक्षांच्या मुख्यमंत्री व नेत्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 05:07 IST

भाजपने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आराेप

काेलकाता : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विराेधी पक्षांना भाजपविराेधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हाेत असल्याचा आराेपही त्यांनी केला असून, भाजपविराेधात नवी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न ममतांनी सुरू केले आहेत. त्यांनी सर्व गैरभाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री विराेधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिले असून, भाजपविराेधात एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. या लढ्याची रणनीती ठरविण्यासाठी ममतांनी बैठकही बाेलाविली आहे.ममता बॅनर्जींनी लिहिले आहे की, भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सुडाचे राजकारण करीत असून, सीबीआय, ईडी यासारख्या संस्थांचा गैरवापर करून देशातील लाेकशाहीवर हल्ला हाेत आहे. निवडणुका जवळ असतात, त्यावेळी केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्शन माेडवर येतात. या दडपशाहीचा प्रतिकार करायला हवा. विराेधकांचा छळ करून काेंडीत पकडण्याचे राजकारण भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे सर्व विराेधकांनी याविराेधात एकत्र येऊन या दडपशाहीचा प्रतिकार करायला हवा. प्रत्येकाला साेयीस्कर ठरेल अशा ठिकाणी सर्वांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा करू, असे आवाहन ममतांनी पत्राद्वारे भाजप विराेधकांना केले आहे.

मार्च महिन्यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही ममतांनी सर्व विराेधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले हाेते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला बाजूला ठेवून आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला हाेता.तृणमूलमध्ये विश्वासार्हता नाही- काँग्रेसममतांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगाल भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी सांगितले, की तृणमूलची राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाकांक्षा आहे. मात्र, ती पूर्णपणे फसली आहे. तर तृणमूलमध्ये भाजपविराेधात लढण्यासाठी विश्वासार्हता नसल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुल मन्नन यांनी सांगितले.अभिषेक बॅनर्जी ईडीच्या चाैकशीला गैरहजरतृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे ईडीच्या चाैकशीला गैरहजर राहिले. मनी लाँड्रिंग आणि काेळसा घाेटाळ्याप्रकरणी त्यांना चाैकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले हाेते. मात्र, वैयक्तिक कारण देऊन त्यांनी हजर राहण्यास असमर्थ असल्याचे ईडीला कळविल्याचे सांगण्यात आले आहे. चाैकशीसाठी त्यांना पुन्हा समन्स बजाविण्यात येऊ शकताे. यापूर्वी २१ मार्च राेजी त्यांची सुमारे आठ तास चाैकशी करण्यात आली हाेती.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी