शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मल्ल्या, मोदी, चोक्सीच्या मालमत्तेचा ईडीकडून लिलाव; घोटाळ्याचे ८,४४१ कोटी बँकेत जमा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 07:45 IST

उपलब्ध माहितीनुसार, या तिन्ही उद्योगपतींनी बँकांना गंडा घातल्याची तक्रार सीबीआयकडे केल्यानंतर या प्रकरणात ईडीनेदेखील ईसीआयआर नोंदवत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. तसेच या तिघांची मिळून एकूण १८ हजार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, दागिने, सोने अशी मालमत्ता जप्त केली होती. 

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्ज घेत या बँकांना गंडा घालणाऱ्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची मालमत्ता जप्त करत आणि त्यांची विक्री करत त्याद्वारे आलेले ८,४४१ कोटी रुपये ईडीने बँकांना परत केले आहेत. या तिघांनी मिळून बँकांना तब्बल २३ हजार कोटी रुपयांचा गंडा घातला होती. ईडीच्या ताज्या कारवाईनंतर या घोटाळ्यापैकी २२ हजार ५८५ कोटी रुपये आतापर्यंत घोटाळ्याचा फटका बसलेल्या बँकांना परत मिळाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, या तिन्ही उद्योगपतींनी बँकांना गंडा घातल्याची तक्रार सीबीआयकडे केल्यानंतर या प्रकरणात ईडीनेदेखील ईसीआयआर नोंदवत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. तसेच या तिघांची मिळून एकूण १८ हजार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, दागिने, सोने अशी मालमत्ता जप्त केली होती. 

त्यानंतर जुलै २०२२मध्ये नीरव मोदी याची आणखी काही मालमत्ता हाँगकाँग येथे असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासादरम्यान समजले. त्यानंतर ईडीने नीरव मोदी याची २,६५० कोटी ७० लाख रुपयांची हाँगकाँग येथील मालमत्ता जप्त केली होती. 

जप्त केलेल्या मालमत्तांचा न्यायालयीन प्रक्रियेनंतर लिलाव करण्यात ईडीला यश आले असून, अलीकडे केलेल्या लिलावाद्वारे ८,४४१ कोटी रुपये ईडीला मिळाले. हे पैसे ईडीने घोटाळ्याचा फटका बसलेल्या बँकांना परत केले आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत २३ हजार कोटी रुपयांपैकी २२ हजार ५८५ कोटी रुपये बँकांना परत मिळाले आहेत. 

कुणाचे किती घोटाळे? --  सध्या लंडनमध्ये असलेल्या विजय मल्ल्याने त्याच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकप्रणित ११ बँकांकडून घेतलेले कर्ज बुडविल्यामुळे या बँकांना ६,२०० कोटी रुपयांचा फटका बसला होता. त्याचबरोबर तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केल्याचा त्याच्यावर ठपका आहे. -  हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५७८ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. तो सध्या लंडनमध्ये कैदेत आहे.-  नीरव मोदीचा भाचा असलेला मेहुल चोक्सी यानेदेखील मोदी याच्यासोबत मिळून पंजाब नॅशनल बँकेला गंडा घातला आहे.

१,७०० प्रकरणांत १ लाख कोटींची मालमत्ता जप्त -गेल्या १५ वर्षांत मनी लाँड्रिंग कायद्याखाली एकूण १,७०० प्रकरणांत कारवाई केली असून, या कारवाईअंतर्गत तब्बल १ लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीVijay Mallyaविजय मल्ल्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय