शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधान नरेंद्र मोदी विषारी सापासारखे', कर्नाटक निवडणुकीदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 16:44 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक विधान केलं आहे.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज एका सबेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्य केले आहे. खरगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत. जो कोणी चाखेल तो मरेल, असं आक्षेपार्ह विधान त्यांनी केलं. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात एका निवडणूक सभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'पीएम मोदी हे विषारी सापासारखे आहेत. विष आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण जर तुम्ही त्याचा स्वाद घेतला तर तुम्ही पुन्हा मराल.' कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी खरगे यांचे हे विधान काँग्रेससाठी निवडणूक अडचणीचे ठरू शकते.

PM नरेंद्र मोदींनी सांगितला आत्महत्येवर 'जोक', राहुल गांधींनी घेतला पंतप्रधानांचा समाचार...

खरगे यांच्या वक्तव्यावर भाजपनेही हल्लाबोल सुरू केला आहे. पक्षाचे आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी खरगे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर केला असून काँग्रेसची निराशा दिसून येत आहे. अमित मालवीय यांनी लिहिले, 'आता काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणतात की पीएम मोदी हे विषारी साप आहे. काँग्रेसची सतत घसरण होत आहे. काँग्रेसची ही हतबलता सांगत आहे की, ते कर्नाटकात आपले स्थान गमावत आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही खरगे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसचे अध्यक्ष केले आहे, पण त्यांचे कोणी ऐकत नाही, असंही ते म्हणाले. त्यामुळे मी सोनिया गांधींच्याही पुढे जाऊ शकेन अशा पद्धतीने मी काय बोलू, असा विचार त्यांनी केला. कधी काँग्रेसचे कोणी मोदी म्हणतात, तुमची कबर खोदली जाईल, तर कधी साप म्हणतात. पीएम मोदींविरोधात अशी भाषा काँग्रेससाठीच थडगे खोदणारी आहे, असंही अनुराग ठाकूर म्हणाले. तुमचे नेते परकीय शक्तींसोबत भारताविरुद्ध कट रचतात आणि त्यांची मदत मागतात. मग भारतातील देशातील सर्वात लोकप्रिय नेत्याच्या विरोधात आक्षेपार्ह भाषण द्या. काँग्रेसची अवस्था पाण्याविना माशासारखी झाली आहे. ते सत्तेसाठी तळमळत आहेत आणि हताशपणे अशी विधाने केली जात आहेत.

मल्लिकार्जुन खरगे यांचे हे विधान भाजपला निवडणुकीत मुद्दा देणार आहे. भाजपने बसवराज बोम्मई यांच्यासह कोणत्याही नेत्याला राज्यात आपला मुख्यमंत्री चेहरा बनवलेला नाही. निवडणूक फक्त काँग्रेस विरुद्ध मोदी अशीच ठेवायची आहे. अशा स्थितीत मल्लिकार्जुन खरगे यांचे विधान म्हणजे भाजपच्या हाती एखादा मुद्दा सहज सोपवण्यासारखे आहे. यामुळे आता भाजप या मुद्द्यावरुन काँग्रेसला घेरणार असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे