शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरून मला अध्यक्षपद मिळाले - मल्लिकार्जुन खर्गे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 14:46 IST

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधत काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः पक्षप्रमुख होण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून मला अध्यक्षपद मिळाले, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. याचबरोबर, मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधत काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे म्हटले आहे. महिला काँग्रेसच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत फक्त स्वतःबद्दल बोलतात. त्यांना गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर आठवत नाहीत. मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान तिकडे गेले नाहीत, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. तसेच, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १५ ऑगस्टच्या भाषणावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर सांगितले की, पुढच्यावेळी ते पुन्हा येथे ध्वजारोहण करतील. मी म्हणालो, ते झेंडा नक्कीच फडकावतील पण आपल्या घरी आणि अमित शहा आपल्या घरी पत्नीसह आपल्या घरी फडकवतील. 

याचबरोबर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, राहुल गांधी भारताला जोडण्याचे काम करतात तर पंतप्रधान ते तोडण्याचे काम करतात. पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. महिलांनी निर्धार केला तर त्या भाजप सरकारला हटवू शकतात. तसेच, बांगलादेश युद्धाचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र केला, पाकिस्तानच्या एक लाख लोकांना तुरुंगात टाकले. तर आकाशात उडणाऱ्या गरुडाला म्हैस म्हणत मोदींनी दिशाभूल केली. याशिवाय, विरोधी पक्षांच्या नेत्यांना तपास यंत्रणांकडून टार्गेट केले जात आहे. मात्र, काँग्रेस घाबरत नाही, असेही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी