शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करा; भाजप खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 07:37 IST

‘लिव्ह-इन’वर बंदी घालण्यासाठी कायदा करा

नवी दिल्ली : सरकारने देशात ‘लिव्ह-इन’ नातेसंबंधांवर बंदी घालण्यासाठी कायदा करावा आणि प्रेमविवाहास पालकांची संमती घेणे अनिवार्य केले पाहिजे, अशी मागणी भाजप खासदार धरमवीर सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत केली.

हरयाणाच्या भिवानी - महेंद्रगडचे लोकसभा सदस्य धरमवीर सिंह यांनी कनिष्ठ सभागृहात शून्य तासात सांगितले की, देशात प्रेमविवाह वाढल्यामुळे घटस्फोटाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे, तर ‘लिव्ह-इन’ संबंधांमुळे देशाची संस्कृती बदलली आहे, ती नष्ट होत आहे. पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातही ‘लिव्ह-इन’ नातेसंबंधासारखी सामाजिक दुष्प्रवृत्ती वाढत आहे, ज्याचे गंभीर परिणाम होत आहेत. यामुळे आपली संस्कृती नष्ट होत आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ थांबविण्यासाठी देशात कायदा करायला हवा.

‘आंतरजातीय विवाहला कोणीही रोखू शकत नाही’

जर एखादा तरुण व तरुणी एकमेकांना पसंत करत असतील आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला तर त्यांची जातपात कोणतीही असो, त्यांचा आंतरजातीय विवाह कोणीही रोखू शकत नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना मुलगा व मुलीचे पालक किंवा त्यांच्यापैकी एकाचे पालक यांचा विरोध असतो. मात्र, तरीही असे विवाह कोणीही रोखू शकणार नाही. सेक्युलॅरिझम तसेच सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या नावाखाली माकप आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देत आहे, असा आरोप केरळमधील एका धार्मिक विचारवंताने केला होता. 

त्याला उत्तर देताना पिनाराई विजयन म्हणाले की, माकप किंवा त्या पक्षाची डीवायएफआय ही विद्यार्थी संघटना आंतरजातीय विवाह संस्था ( इंटरकास्ट मॅरेज ब्युरो) म्हणून काम करत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. आंतरजातीय विवाहात झालेली वाढ हा काळानुसार झालेला बदल आहे. 

टॅग्स :marriageलग्नBJPभाजपा