शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

बांदामध्ये मोठी दुर्घटना; यमुना नदीत बोट बुडाली, 4 जणांचा मृत्यू 46 बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 17:19 IST

रक्षाबंधनाच्या दिवशीच यूपीच्या बांदामध्ये ही मोठी घटना घडली आहे.

कानपूर:उत्तर प्रदेशातील बांदा येथे गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. यमुना नदीतून 50 जणांना घेऊन जाणारी एक बोट बुडाली. मारका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस गोताखोरांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि इतरांचा शोध सुरू केला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, यमुना नदीतून 50 जणांना घेऊन एक बोट जात होती, यादरम्यान हथनीकुंड बॅरेजमधून सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बोट नदीन बुडाली. प्रवाह जास्त असल्यामुळे पाणबुड्यांनाही लोकांना वाचवण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, त्यांनी 4 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून, इतर 46 जणांचा शोध सुरू आहे. 

या बोटीतील काही लोक रक्षाबंधन सणानिमित्त आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठीही जात होते. रक्षाबंधन सणावर झालेल्या अपघातामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. दुसरीकडे वरिष्ठ अधिकारीही या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. असेच एक प्रकरण बनारसमध्ये तीन महिन्यांपूर्वी समोर आले होते. गंगा नदीत एक बोट बुडून तिघांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :riverनदीDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश