शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

कोरोनाने शिक्षणात मोठे बदल घडवले; महिंद्रा स्वतंत्र विद्यापीठ थाटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 5:46 AM

डेटा सायन्स, ब्लॉकचेन, डेटा कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल; अनॅलिटिक्ससारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाने इतर क्षेत्रांसह शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले आहेत. शिक्षण क्षेत्र या काळात पूर्णपणे आॅनलाइन व्यासपीठावर येत आहे. शिक्षणाच्या पद्धतीत बदल होत असतानाच शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक असल्याची भूमिका घेत महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने स्वत:चे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हैदराबादमध्ये १३० एकर जागेवर सुरू होणाऱ्या या विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रम शिकविले जातील.विद्यापीठाच्या आराखड्याप्रमाणे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात व्यवस्थापन शिक्षण (स्कूल आॅफ मॅनेजमेंट), इंदिरा महिंद्रा स्कूल आॅफ एज्युकेशन, २०२१-२२ मध्ये विधि शिक्षण (स्कूल आॅफ लॉ ), २०२२-२३ मध्ये माध्यम शिक्षण, तर २०२३-२४ मध्ये स्कूल आॅफ डिझाइन सुरू करण्याचा मानस आहे. यामध्ये २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या अभियांत्रिकी संस्थेचा समावेश असणार आहे. कोरोनानंतरच्या काळात पारंपरिक शिक्षणापेक्षा मानवतावादाचा अभ्यास करून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोकांच्या समस्या सोडविण्याची आवश्यकता आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या मदतीने मिळालेल्या नोकºया या कोरोना काळातील नुकसानभरपाई ठरू शकतील, असे मत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या विद्यापीठाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

नव्याने उदयाला येणाºया डेटा सायन्स, ब्लॉकचेन, डेटा अनॅलिटिक्ससारख्या तंत्रज्ञानासोबत समकालीन अभ्यासक्रमाचा समावेश या स्वायत्त विद्यापीठात असेल. टेक महिंद्रा कंपनीच्या ना नफा भागीदारी तत्त्वावर चालणाºया महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा हे विद्यापीठ भाग असणार आहे, असे त्यांनी सांगितले.जपानमधील तज्ज्ञांचीही मदत घेणारव्यावसायिक शिक्षण, प्रकल्पातून जगताना प्रत्यक्ष येणाºया समस्यांना तोंड देण्यासाठीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न या विद्यापीठातून करण्यात येईल. युरोप आणि अमेरिकेतील विद्यापीठांशिवाय जपानमधील तंत्रज्ञानामधील तज्ज्ञांची मदत घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.पुढील पाच वर्षांत ४००० हून अधिक विद्यार्थी तसेच ३०० हून अधिक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सांगितले.विद्यार्थ्यांमधीलप्रतिभा शोधणारमहिंद्रा विद्यापीठातून कॉर्पोरेट आणि उद्योग जगताला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय तंत्रशिक्षण पद्धतीमध्ये बदल होण्याची गरज असून उद्योगांतील आवश्यकतेप्रमाणे विद्यार्थ्यांमधील प्रतिभा शोधण्याची आवश्यकता आहे. आम्ही या विद्यापीठामधून नेमके तेच करणार आहोत.- विनीत नायर,अध्यक्ष महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राEducationशिक्षणuniversityविद्यापीठ