शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कोरोनाने शिक्षणात मोठे बदल घडवले; महिंद्रा स्वतंत्र विद्यापीठ थाटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 05:47 IST

डेटा सायन्स, ब्लॉकचेन, डेटा कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल; अनॅलिटिक्ससारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाने इतर क्षेत्रांसह शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले आहेत. शिक्षण क्षेत्र या काळात पूर्णपणे आॅनलाइन व्यासपीठावर येत आहे. शिक्षणाच्या पद्धतीत बदल होत असतानाच शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक असल्याची भूमिका घेत महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने स्वत:चे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हैदराबादमध्ये १३० एकर जागेवर सुरू होणाऱ्या या विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रम शिकविले जातील.विद्यापीठाच्या आराखड्याप्रमाणे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात व्यवस्थापन शिक्षण (स्कूल आॅफ मॅनेजमेंट), इंदिरा महिंद्रा स्कूल आॅफ एज्युकेशन, २०२१-२२ मध्ये विधि शिक्षण (स्कूल आॅफ लॉ ), २०२२-२३ मध्ये माध्यम शिक्षण, तर २०२३-२४ मध्ये स्कूल आॅफ डिझाइन सुरू करण्याचा मानस आहे. यामध्ये २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या अभियांत्रिकी संस्थेचा समावेश असणार आहे. कोरोनानंतरच्या काळात पारंपरिक शिक्षणापेक्षा मानवतावादाचा अभ्यास करून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोकांच्या समस्या सोडविण्याची आवश्यकता आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या मदतीने मिळालेल्या नोकºया या कोरोना काळातील नुकसानभरपाई ठरू शकतील, असे मत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या विद्यापीठाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

नव्याने उदयाला येणाºया डेटा सायन्स, ब्लॉकचेन, डेटा अनॅलिटिक्ससारख्या तंत्रज्ञानासोबत समकालीन अभ्यासक्रमाचा समावेश या स्वायत्त विद्यापीठात असेल. टेक महिंद्रा कंपनीच्या ना नफा भागीदारी तत्त्वावर चालणाºया महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा हे विद्यापीठ भाग असणार आहे, असे त्यांनी सांगितले.जपानमधील तज्ज्ञांचीही मदत घेणारव्यावसायिक शिक्षण, प्रकल्पातून जगताना प्रत्यक्ष येणाºया समस्यांना तोंड देण्यासाठीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न या विद्यापीठातून करण्यात येईल. युरोप आणि अमेरिकेतील विद्यापीठांशिवाय जपानमधील तंत्रज्ञानामधील तज्ज्ञांची मदत घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.पुढील पाच वर्षांत ४००० हून अधिक विद्यार्थी तसेच ३०० हून अधिक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सांगितले.विद्यार्थ्यांमधीलप्रतिभा शोधणारमहिंद्रा विद्यापीठातून कॉर्पोरेट आणि उद्योग जगताला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय तंत्रशिक्षण पद्धतीमध्ये बदल होण्याची गरज असून उद्योगांतील आवश्यकतेप्रमाणे विद्यार्थ्यांमधील प्रतिभा शोधण्याची आवश्यकता आहे. आम्ही या विद्यापीठामधून नेमके तेच करणार आहोत.- विनीत नायर,अध्यक्ष महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राEducationशिक्षणuniversityविद्यापीठ