शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

कोरोनाने शिक्षणात मोठे बदल घडवले; महिंद्रा स्वतंत्र विद्यापीठ थाटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 05:47 IST

डेटा सायन्स, ब्लॉकचेन, डेटा कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल; अनॅलिटिक्ससारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाने इतर क्षेत्रांसह शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले आहेत. शिक्षण क्षेत्र या काळात पूर्णपणे आॅनलाइन व्यासपीठावर येत आहे. शिक्षणाच्या पद्धतीत बदल होत असतानाच शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक असल्याची भूमिका घेत महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने स्वत:चे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हैदराबादमध्ये १३० एकर जागेवर सुरू होणाऱ्या या विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रम शिकविले जातील.विद्यापीठाच्या आराखड्याप्रमाणे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात व्यवस्थापन शिक्षण (स्कूल आॅफ मॅनेजमेंट), इंदिरा महिंद्रा स्कूल आॅफ एज्युकेशन, २०२१-२२ मध्ये विधि शिक्षण (स्कूल आॅफ लॉ ), २०२२-२३ मध्ये माध्यम शिक्षण, तर २०२३-२४ मध्ये स्कूल आॅफ डिझाइन सुरू करण्याचा मानस आहे. यामध्ये २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या अभियांत्रिकी संस्थेचा समावेश असणार आहे. कोरोनानंतरच्या काळात पारंपरिक शिक्षणापेक्षा मानवतावादाचा अभ्यास करून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोकांच्या समस्या सोडविण्याची आवश्यकता आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या मदतीने मिळालेल्या नोकºया या कोरोना काळातील नुकसानभरपाई ठरू शकतील, असे मत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या विद्यापीठाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

नव्याने उदयाला येणाºया डेटा सायन्स, ब्लॉकचेन, डेटा अनॅलिटिक्ससारख्या तंत्रज्ञानासोबत समकालीन अभ्यासक्रमाचा समावेश या स्वायत्त विद्यापीठात असेल. टेक महिंद्रा कंपनीच्या ना नफा भागीदारी तत्त्वावर चालणाºया महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचा हे विद्यापीठ भाग असणार आहे, असे त्यांनी सांगितले.जपानमधील तज्ज्ञांचीही मदत घेणारव्यावसायिक शिक्षण, प्रकल्पातून जगताना प्रत्यक्ष येणाºया समस्यांना तोंड देण्यासाठीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न या विद्यापीठातून करण्यात येईल. युरोप आणि अमेरिकेतील विद्यापीठांशिवाय जपानमधील तंत्रज्ञानामधील तज्ज्ञांची मदत घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.पुढील पाच वर्षांत ४००० हून अधिक विद्यार्थी तसेच ३०० हून अधिक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सांगितले.विद्यार्थ्यांमधीलप्रतिभा शोधणारमहिंद्रा विद्यापीठातून कॉर्पोरेट आणि उद्योग जगताला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय तंत्रशिक्षण पद्धतीमध्ये बदल होण्याची गरज असून उद्योगांतील आवश्यकतेप्रमाणे विद्यार्थ्यांमधील प्रतिभा शोधण्याची आवश्यकता आहे. आम्ही या विद्यापीठामधून नेमके तेच करणार आहोत.- विनीत नायर,अध्यक्ष महिंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राEducationशिक्षणuniversityविद्यापीठ