शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

महाशिवरात्री

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

धार्मिक वातावरणात साजरी झाली महाशिवरात्री

धार्मिक वातावरणात साजरी झाली महाशिवरात्री
मंदिरात उसळली भाविकांची गर्दी : ठिकठिकाणी अभिषेक, पूजा अन् जागरण
नागपूर : महादेवाचे अतिशय प्राचीन आणि स्वयंभू मंदिर नागपुरात आहे. हे सर्व मंदिर भाविकांच्या श्रद्धेय असल्याने, महाशिवरात्रीचा भव्य उत्सव या मंदिरांमध्ये साजरा करण्यात आला. अभिषेक, पूजा, भजन, कीर्तन, जागरण, महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी दिसून आली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले.
भूतेश्वर मंदिर, गुजरनगर
नागपुरातील सर्वात प्राचीन, ८०० वर्षाचा इतिहास असलेले भूतेश्वर शिवमंदिर जागृत देवस्थान आहे. स्मशानभूमीच्या परिसरात हे देवस्थान असल्याने याला भूतेश्वर हे नाव पडले आहे. या मंदिराप्रती भाविकांची श्रद्धा असल्याने, महाशिवरात्रीला सकाळपासूनच भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचेही वितरण करण्यात आले.
कल्याणेश्वर मंदिर, तेलंगखेडी
तेलंगखेडीचे शिवमंदिर प्राचीन मंदिर असून, शहरात प्रसिद्ध आहे. भोसल्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे स्वयंभू मंदिर असून, लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने, मोठ्या संख्येने भाविक आज दर्शनासाठी आले होते. सकाळी महाआरती करून, अभिषेक करण्यात आला. दिवसभर मृत्युंजय मंत्राचा जप सुरू होता. दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता, कुठलीही विपरीत घटना घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. मंगळवारी मध्यरात्री महानिशितकालमध्ये महापूजा होणार आहे.
अर्धनारीनटेश्वर मंदिर, मोक्षधाम
मोक्षधाम घाटावरील अर्धनारीनटेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव धार्मिक वातावरणात साजरा झाला. महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली. १९७७ मध्ये मोक्षधाम घाटावर अर्धनारीनटेश्वराच्या मूर्तीची स्थापना झाली. तेव्हापासून महाशिवरात्रीचा भव्य उत्सव येथे साजरा होतो. दोन दिवसीय या उत्सवात विविध कार्यक्रम होतात. मंगळवारी सकाळी पूजा झाल्यानंतर भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्रीला जागरणाचा कार्यक्रम झाला. लहान मुले, महिलांनीही आज मोक्षधाम घाटावर जाऊन दर्शन घेतले. या उत्सवानिमित्त मोक्षधाम घाटाचे वातावरण धार्मिक झाले होते.