शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

Breaking News: इंदूरहून अमळनेरला येणारी एसटी नर्मदा नदीत कोसळली; १२ प्रवाशांचे मृतदेह सापडले, अनेक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 11:48 IST

ST Bus Accident in Madhya Pradesh: खलघाट संजय सेतू पुलावरून नियंत्रण गमावल्याने एसटी बस २५ फूट खोल असलेल्या पुराच्या पाण्याने भरलेल्या नदीपात्रात कोसळली.

 मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे मोठा अपघात झाला आहे. महाराष्ट्राची एसटी बस इंदौरहून अमळनेरकडे येत होती, यावेळी ती पुलावरून नर्मदा नदीपात्रात कोसळली. यामध्ये १२ प्रवाशांचे मृतदेह सापडले असून १५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची एसटी बस आहे.

खलघाट संजय सेतू पुलावरून नियंत्रण गमावल्याने एसटी बस २५ फूट खोल असलेल्या पुराच्या पाण्याने भरलेल्या नदीपात्रात कोसळली. यानंतर तातडीने मदत कार्य सुरु करण्यात आले. अॅम्बुलन्सद्वारे धामनोद सरकारी हॉस्पिटलमध्ये जखमींना उपचारासाठी नेण्यात आले आहे. 30 ते 35 प्रवासी बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेला एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दुजोरा दिला.

घटनास्थळी पोलीस आणि गोताखोर प्रवाशांचा शोध घेत आहेत. NDRF ची टीमदेखील घटनास्थळी पोहोचलेली आहे. या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते असे सांगतिले जात आहे. यापैकी महाराष्ट्रातील किती याची आकडेवारी मिळू शकलेली नाही. 

सकाळी ही बस इंदूरहून निघाली, वाटेत खलघाटात ही बस नर्मदा नदीत कोसळली. एम.एच. -४० - ९८४८ असा या बसचा क्रमांक आहे. बसचालक सी.ई. पाटील व वाहक प्रकाश श्रावण चौधरी यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती अमळनेर आगार प्रमुख अर्चना भदाणे यांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघातstate transportएसटी