शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या निकालाने देशातील राजकारण बदलेल, वातावरण काँग्रेसच्या बाजूने: सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 05:36 IST

सोनिया गांधी म्हणाल्या की, देशातील वातावरण पक्षाच्या बाजूने आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली:  महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमध्ये काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. देशातील वातावरण पक्षाच्या बाजूने आहे. मात्र, अतिआत्मविश्वास न ठेवता आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल. लोकसभा निवडणुकीत मिळालेला जनतेचा पाठिंबा आणि भावना आपल्याला कायम ठेवायच्या आहेत, असे काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी बुधवारी पक्षाच्या नेत्यांना सांगितले.

सोनिया गांधी म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीप्रमाणे चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल होईल. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिखट हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीतील धक्क्यातून धडा घेण्याऐवजी मोदी सरकार अजूनही समुदायांमध्ये फूट पाडत असून, भीती आणि शत्रुत्व पसरवत आहे. जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. यावेळी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह सर्व खासदार उपस्थित होते.

गांधी म्हणाल्या...

जनगणना करण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही.आमचे किमान १२ कोटी नागरिक  राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या लाभांपासून वंचित आहेत.काही आठवड्यांत किमान ११ दहशतवादी हल्ले ही अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी.जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही ठीक असल्याचा दावा हास्यास्पद.मणिपूरमधील परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत.

नियम का बदलले?

उत्तर प्रदेशातील कावड यात्रेच्या मार्गावर दुकानदारांची नावे लावण्याचा निर्णय का घेण्यात आला? सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळी हस्तक्षेप केला; परंतु तो केवळ तात्पुरता दिलासा असू शकतो. नोकरशाहीला आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यासाठी नियम अचानक बदलण्यात आले, असा दावा त्यांनी केला. 

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे