शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
2
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
3
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
4
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
5
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
6
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
7
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
8
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
9
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
10
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
11
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
12
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
13
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
14
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
15
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
16
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा
17
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
18
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
19
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
20
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."

उद्योग, व्यापारास प्रोत्साहनात महाराष्ट्र देशात १३ व्या स्थानीच; आंध्र प्रदेश सर्वप्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 2:31 AM

उत्तरप्रदेशने १० जागांची झेप घेत २०१९मध्ये दुसरा क्रमांक पटकावला. २०१८मध्ये हे राज्य १२व्या क्रमांकावर होते.

नवी दिल्ली : व्यावसायिक सुलभतेच्या क्रमवारीत आंध्रप्रदेशने सलग तिसºयावेळी देशात सर्वप्रथम क्रमांक राखला. उद्योग व अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठीच्या क्रमवारीत महाराष्ट्र या वर्षीही १३व्या स्थानीच राहिला आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी जारी केलेल्या अहवालानुसार, व्यवसाय सुधारणा कृती योजना २०१९ प्रभावीपणे राबविण्यावरून ही क्रमवारी ठरविली आहे.

उत्तरप्रदेशने १० जागांची झेप घेत २०१९मध्ये दुसरा क्रमांक पटकावला. २०१८मध्ये हे राज्य १२व्या क्रमांकावर होते. २०१५च्या क्रमवारीत गुजरात अव्वल होता. आंध्र दुसºया व तेलंगणा १३व्या स्थानी होता. २०१६मध्ये आंध्र व तेलंगणा संयुक्तरीत्या प्रथम क्रमांकावर होते. जुलै २०१८मध्ये जारी क्रमवारीत आंध्र प्रथम, तेलंगणा दुसरा तर हरयाणा तिसऱ्या स्थानी होता. आता हरयाणा १६व्या स्थानी आहे.

जागतिक बँकेच्या व्यावसायिक सुलभता अहवालात भारताने १४ जागांची झेप घेऊन ६३वे स्थान पटकावले. उत्तर भारतात उत्तर प्रदेश, पश्चिम भारतात मध्य प्रदेश, पूर्व भारतात झारखंड, दक्षिण भारतात आंध्र, तर केंद्रशासित प्रदेशांत दिल्ली आणि ईशान्य भारतात आसाम पहिल्या स्थानावर आहे.

या अहवालावरून हेच दिसते की, राज्यांनी योग्य पद्धतीने अभ्यास केलेला आहे. हेच त्यांना व्यवसाय सुलभ वातावरण निर्माण करण्यास साह्यकारी ठरेल.- निर्मला सीताराम, अर्थमंत्री

आपल्या प्रणाली व प्रक्रियांमध्ये निरंतर सुधारणा केलेल्या राज्यांचे प्रतिबिंब क्रमवारीत दिसते आहे. क्रमवारी घसरलेल्या राज्यांना हा अहवाल खडबडून जागे करणारा आहे.- पीयूष गोयल, उद्योगमंत्रीदिल्लीची झेप २३ वरून १२ व्या स्थानी

देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या या क्रमवारीत २०१८मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारे तेलंगणा राज्य २०१९मध्ये तिसºया क्रमांकावर घसरले आहे. मध्यप्रदेश (चौथे), झारखंड (पाचवे), छत्तीसगढ (सहावे), हिमाचल प्रदेश (सातवे), राजस्थान (आठवे), पश्चिम बंगाल (नववे) आणि गुजरात दहाव्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. दिल्लीने मागील २३व्या क्रमांकावरून आता १२व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. महाराष्टÑ १३व्या स्थानी आहे. आसाम (विसाव्या), जम्मू-काश्मीर (२१व्या), गोवा (२४व्या), बिहार २६व्या व केरळ २८व्या क्रमांकावर आहे. त्रिपुरा सर्वांत तळाला म्हणजे ३६व्या क्रमांकावर आहे.

क्रमवारी काढण्यामागचा उद्देश

राज्यांमध्ये व्यावसायिक स्पर्धा वाढावी व देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक वातावरणात सुधारणा करावी, या उद्देशाने ही क्रमवारी जारी केली जाते. २०१५मध्ये प्रथम अहवाल जारी झाला होता. त्यानंतर हा चौथा अहवाल आहे.

क्रमवारी कशाच्या आधारावर ?

व्यवसाय सुधारणा कृती आराखडा २०१९-२० मध्ये राज्यांच्या धोरणांची माहिती, मंजुरीसाठी सुरु केलेली एक खिडकी प्रणाली, श्रम व पर्यावरणासंदर्भातील कायद्यांचे रक्षण, यासारख्या ४५ नियामक क्षेत्रांचा समावेश असणाºया १८१ मुद्द्यांवरून ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेश