शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Maharashtra Political Crisis: तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय, फडणवीसांनाही होती कल्पना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 10:24 IST

Maharashtra Political Crisis: गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रामध्ये घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर अखेर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गुरुवारी दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली असली तरी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आधीच झाला होता, अशी माहिती समोर येत आहे.

नवी दिल्ली - गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रामध्ये घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर अखेर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपानेदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी न सोपवता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याने आणि सरकारमध्ये सहभागी होणार नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास भाग पाडल्याने आता त्याचीच चर्चा अधिक सुरू आहे. मात्र गुरुवारी दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली असली तरी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आधीच झाला होता, अशी माहिती समोर येत आहे.

काल दुपारी एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यपालांकडे जात सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि भाजपा त्यांना पाठिंबा देईल, अशी घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र आपण सरकारमध्ये आपण सहभागी होणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते. पण पक्षश्रेष्ठींनी दबाव आणल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय हा दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले होते. तेव्हा हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच हे सर्व नियोजित कार्यक्रमानुसार घडले होते.

दरम्यान, शपथग्रहण सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र असं काही नसेल असं विधान शिंदे गटामधील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे. ते म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. ते एवढे कुशल आहेत की, ते कुठल्याही पदावर काम करतील. देवेंद्र फडणवीस राज्यासाठी एका संपत्तीसारखे आहेत. जर ते त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी मंत्रालयात असतील तर तो एक चांगला निर्णय आहे, असे केसरकर म्हणाले.

दरम्यान, काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधत आणि ट्विट करत फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही असेच ट्विट केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणे फडणवीस यांना भाग पडले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस