शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Political Crisis: तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय, फडणवीसांनाही होती कल्पना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 10:24 IST

Maharashtra Political Crisis: गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रामध्ये घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर अखेर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गुरुवारी दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली असली तरी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आधीच झाला होता, अशी माहिती समोर येत आहे.

नवी दिल्ली - गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रामध्ये घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर अखेर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपानेदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी न सोपवता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याने आणि सरकारमध्ये सहभागी होणार नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास भाग पाडल्याने आता त्याचीच चर्चा अधिक सुरू आहे. मात्र गुरुवारी दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली असली तरी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आधीच झाला होता, अशी माहिती समोर येत आहे.

काल दुपारी एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यपालांकडे जात सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि भाजपा त्यांना पाठिंबा देईल, अशी घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र आपण सरकारमध्ये आपण सहभागी होणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते. पण पक्षश्रेष्ठींनी दबाव आणल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय हा दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले होते. तेव्हा हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच हे सर्व नियोजित कार्यक्रमानुसार घडले होते.

दरम्यान, शपथग्रहण सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र असं काही नसेल असं विधान शिंदे गटामधील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे. ते म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. ते एवढे कुशल आहेत की, ते कुठल्याही पदावर काम करतील. देवेंद्र फडणवीस राज्यासाठी एका संपत्तीसारखे आहेत. जर ते त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी मंत्रालयात असतील तर तो एक चांगला निर्णय आहे, असे केसरकर म्हणाले.

दरम्यान, काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधत आणि ट्विट करत फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही असेच ट्विट केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणे फडणवीस यांना भाग पडले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस