शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Maharashtra Politics: नवी तारीख! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर २७ सप्टेंबरला सुप्रीम सुनावणी; घटनापीठ निर्णय देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 20:38 IST

सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणीत काय होणार? नेमका कुणाला दिलासा मिळणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics:एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. यातच आता सर्वोच्च न्यायालयात केलेल्या विविध याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाच्या यादीत लागल्या आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी घेण्यात येणार आहे. 

मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी  सुरु आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती, पण सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले होते. त्यामुळे आता पुढील सुनावणीत निवडणूक आयोगाची कार्यवाही चालू ठेवायची की नाही, याबाबत सुरुवातीला फैसला अपेक्षित आहे. 

मागील सुनावणीत शिवसेनेला मिळाला होता दिलासा

यापूर्वी ७ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती. मात्र, केवळ १० मिनिटांच्या युक्तिवादानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्या सुनावणीत घटनापीठानं निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले होते. हा शिवसेनेसाठी मोठा दिलासा मानला गेला होता. शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी घटनापीठापुढे युक्तिवाद केला होता. तत्पूर्वी, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण असून, सर्वोच्च न्यायालयातही शिवसेनेच्या बाजूने फैसला होईल, असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  

दरम्यान, शिंदे गटाकडून गेल्या सुनावणीत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली होती. त्यावर अभिषेक मनू सिंघवी यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अगोदर निर्णय घेण्याची मागणी केली होती. दुसरीकडे, या पाच सदस्यीय खंडपीठात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या.हिमा कोहली, न्या. पी. नरसिंहा यांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे