शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Heavy Rains and Floods: महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी-पुराने विध्वंस, मृतांचा आकडा 105 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 17:46 IST

Maharashtra Heavy Rains and Floods: राज्यातील पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 11,836 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

Maharashtra Heavy Rains and Floods: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू झाला. पावसामुळे महाराष्ट्रातील एकूण 28 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये पुणे, सातारा, नाशिक, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, वाशीम, यवतमाळ, धुळे, जालना, अकोला, बुलढाणा, भंडारा, नागपूर, नंदुरबार, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, नांदेड, अमरावती, वर्धा, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, गडचिरोली, सांगली, चंद्रपूर या शहरांचा समावेश आहे. 

या जिल्ह्यांमध्ये 1 जून 2022 पासून अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांत राज्याच्या या भागांमध्ये सरासरी 24.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या घटनांमध्ये सात जण बेपत्ता असून 69 जण जखमी झाले आहेत. तसेच, 189 गुरे मरण पावली आहेत. महाराष्ट्रातील एकूण 275 गावांना पुराचा फटका बसला आहे. राज्यात पावसामुळे विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 44 घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर 1368 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

राज्यातील पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 11836 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून 73 मदत शिबिरे चालवली जात आहेत. एनडीआरएफच्या 12 तुकड्या केंद्राकडून राज्यात मदत आणि बचाव कार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई येथे एनडीआरएफच्या 2-2 पथके बचाव कार्यात गुंतलेली आहेत. एनडीआरएफची 1-1 टीम पालघर, सातारा, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये मैदानात आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची चार पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. यापैकी एसडीआरएफची 2 पथके वर्धा, 1-1 नांदेड आणि गडचिरोलीमध्ये बचाव कार्यात सहभागी आहेत. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या अहवालात पाऊस, वीज पडणे, दरड कोसळणे आणि झाडे पडणे यामुळे 105 लोकांचा मृत्यू जाल्याचे कारण देण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा वेधशाळेत 12.8 मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ वेधशाळेत गेल्या 24 तासांत 23.3 मिमी पावसाची नोंद झाली. 

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस