शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Maharashtra Heavy Rains and Floods: महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी-पुराने विध्वंस, मृतांचा आकडा 105 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 17:46 IST

Maharashtra Heavy Rains and Floods: राज्यातील पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 11,836 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

Maharashtra Heavy Rains and Floods: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू झाला. पावसामुळे महाराष्ट्रातील एकूण 28 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये पुणे, सातारा, नाशिक, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, वाशीम, यवतमाळ, धुळे, जालना, अकोला, बुलढाणा, भंडारा, नागपूर, नंदुरबार, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, नांदेड, अमरावती, वर्धा, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, गडचिरोली, सांगली, चंद्रपूर या शहरांचा समावेश आहे. 

या जिल्ह्यांमध्ये 1 जून 2022 पासून अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांत राज्याच्या या भागांमध्ये सरासरी 24.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या घटनांमध्ये सात जण बेपत्ता असून 69 जण जखमी झाले आहेत. तसेच, 189 गुरे मरण पावली आहेत. महाराष्ट्रातील एकूण 275 गावांना पुराचा फटका बसला आहे. राज्यात पावसामुळे विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 44 घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर 1368 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

राज्यातील पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 11836 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून 73 मदत शिबिरे चालवली जात आहेत. एनडीआरएफच्या 12 तुकड्या केंद्राकडून राज्यात मदत आणि बचाव कार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई येथे एनडीआरएफच्या 2-2 पथके बचाव कार्यात गुंतलेली आहेत. एनडीआरएफची 1-1 टीम पालघर, सातारा, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये मैदानात आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची चार पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. यापैकी एसडीआरएफची 2 पथके वर्धा, 1-1 नांदेड आणि गडचिरोलीमध्ये बचाव कार्यात सहभागी आहेत. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या अहवालात पाऊस, वीज पडणे, दरड कोसळणे आणि झाडे पडणे यामुळे 105 लोकांचा मृत्यू जाल्याचे कारण देण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा वेधशाळेत 12.8 मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ वेधशाळेत गेल्या 24 तासांत 23.3 मिमी पावसाची नोंद झाली. 

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस