शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : 'मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 09:56 IST

राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रपती राजवटीवरून भाजपावर निशाणा साधला आहे.मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आरोप दिग्विजय यांनी केला.राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली.

कानपूर - भाजपा-शिवसेनेला संधी देऊनही सरकार स्थापन करण्याचा दावा करता आला नाही. दिलेल्या मुदतीत राष्ट्रवादीलाही ते शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आणि राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रपती राजवटीवरून भाजपावर निशाणा साधला आहे. मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे' असं दिग्विजय यांनी म्हटलं आहे. कानपूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी 'महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी योग्य प्रक्रिया सुरू केली होती. त्यांनी सर्वप्रथम सर्वात मोठा पक्ष भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. त्यानंतर दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षाला बोलावण्यात आलं. मात्र, त्या पक्षाकडेही बहुमताचा आकडा नसल्याने तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला आमंत्रित करण्यात आलं. या पक्षाला साडे आठ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र त्याआधी दुपारीच राज्यपालांनी केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. यामागे नेमकं काय कारण आहे?' असं म्हटलं आहे. 

'नियमानुसार स्पष्ट बहुमत नसल्यास सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची  संधी दिली जाते. भाजपाने गोवा, मणिपूर, मेघालयमध्ये हा नियम पाळला नाही आणि महाराष्ट्रात मात्र ही प्रक्रिया केली. मात्र ऐनवेळी जे बदल झाले ते पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा दबावामुळेच झाले आहेत' असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी विधानसभा निवडणुकीनंतर अशी राजवट लागू होण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची क्षमता दाखवून देण्यासाठी तीन दिवसांची वेळ देण्याची विनंती अमान्य करण्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

राष्ट्रपती राजवट का?

विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजपा-शिवसेना युतीला 161 जागांसह बहुमत मिळाले, पण मुख्यमंत्रिपदावर दोघांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी एकत्रितपणे सरकार स्थापण्याचा दावा केला नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला नंतर शिवसेनेला व शेवटी राष्ट्रवादीला सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी निमंत्रित केले, पण तिन्ही पक्ष त्याबाबत अपयशी ठरल्याने राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय उरला नाही. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019President Ruleराष्ट्रपती राजवटMaharashtraमहाराष्ट्र