शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : 'मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 09:56 IST

राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रपती राजवटीवरून भाजपावर निशाणा साधला आहे.मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आरोप दिग्विजय यांनी केला.राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली.

कानपूर - भाजपा-शिवसेनेला संधी देऊनही सरकार स्थापन करण्याचा दावा करता आला नाही. दिलेल्या मुदतीत राष्ट्रवादीलाही ते शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आणि राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रपती राजवटीवरून भाजपावर निशाणा साधला आहे. मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे' असं दिग्विजय यांनी म्हटलं आहे. कानपूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी 'महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी योग्य प्रक्रिया सुरू केली होती. त्यांनी सर्वप्रथम सर्वात मोठा पक्ष भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. त्यानंतर दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षाला बोलावण्यात आलं. मात्र, त्या पक्षाकडेही बहुमताचा आकडा नसल्याने तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला आमंत्रित करण्यात आलं. या पक्षाला साडे आठ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र त्याआधी दुपारीच राज्यपालांनी केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. यामागे नेमकं काय कारण आहे?' असं म्हटलं आहे. 

'नियमानुसार स्पष्ट बहुमत नसल्यास सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची  संधी दिली जाते. भाजपाने गोवा, मणिपूर, मेघालयमध्ये हा नियम पाळला नाही आणि महाराष्ट्रात मात्र ही प्रक्रिया केली. मात्र ऐनवेळी जे बदल झाले ते पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा दबावामुळेच झाले आहेत' असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी विधानसभा निवडणुकीनंतर अशी राजवट लागू होण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची क्षमता दाखवून देण्यासाठी तीन दिवसांची वेळ देण्याची विनंती अमान्य करण्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

राष्ट्रपती राजवट का?

विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजपा-शिवसेना युतीला 161 जागांसह बहुमत मिळाले, पण मुख्यमंत्रिपदावर दोघांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी एकत्रितपणे सरकार स्थापण्याचा दावा केला नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला नंतर शिवसेनेला व शेवटी राष्ट्रवादीला सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी निमंत्रित केले, पण तिन्ही पक्ष त्याबाबत अपयशी ठरल्याने राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय उरला नाही. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019President Ruleराष्ट्रपती राजवटMaharashtraमहाराष्ट्र