शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Government:शिवसेनेने रस्त्यांवर उतरून आंदोलन करावे - दिग्विजय सिंह  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 03:53 IST

भाजपने महाराष्ट्रात राज्यघटना पायदळी तुडवून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असून, त्याविरोधात शिवसेनेने रस्त्यांवर उतरून आंदोलन करायला हवे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी केले.

भोपाळ : भाजपने महाराष्ट्रात राज्यघटना पायदळी तुडवून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असून, त्याविरोधात शिवसेनेने रस्त्यांवर उतरून आंदोलन करायला हवे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी केले.ते म्हणाले की, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी आपली मुंबई व महाराष्ट्रात असलेली ताकद आता दाखवून द्यायला हवी. असे आंदोलन शिवसेनेने केले, तर काँग्रेसही त्यात सहभागी होणार का, या प्रश्नावर त्यांनी, होय, नक्कीच अशा आंदोलनात काँग्रेसचा सहभाग असेल, असे उत्तर दिग्विजय सिंह म्हणाले यांनी दिले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही आणि एकटे अजित पवारच भाजपसोबत गेले आहेत, अशी माझी माहिती आहे, असे सांगताना ते म्हणाले की ज्यांच्यावर भाजपचे नेते सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते, ते अजित पवारच आता भाजपला जवळचे वाटू लागले आहेत. ज्याप्रकारे राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, तो प्रकार घटनाबा'च आहे.याच भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. पण आमच्याकडे बहुमताइतके संख्याबळ नसल्याचे सांगून भाजपने सरकार स्थापनेस नकार दिला होता. आता त्यांच्याकडे बहुमत आहे, असे दाखवणारा कोणता पुरावा भाजपने राज्यपालांना सादर केला, हेही राज्यपालांनी जाहीर करावे, अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली. (वृत्तसंस्था)किती जणांची पत्रे मिळाली?शिवसेनेकडे सर्व आमदारांची सही असलेली पत्रे मागणाऱ्या राज्यपालांना राष्ट्रवादीच्या किती आमदारांची सही असलेली पत्रे मिळाली आहेत, हे जनतेला समजणे आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले की, मुळात बहुमत हे विधानसभेत सिद्ध करायचे असते, राज्यपालांनी त्याची विचारणा करायची नसते, असे सर्वोच्च न्यायालय आणि सरकारिया आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यपालांनी शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराच्या सही मागण्याचे कारण काय होते, हे त्यांनी सांगावे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Digvijaya Singhदिग्विजय सिंहShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस