शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत दखल... महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 09:08 IST

सोनिया गांधी यांनी घेतली पत्राची दखल

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील काही काँग्रेस नेत्यांच्या पत्राची दखल घेऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससह आणि महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मंत्री बदलण्याच्या पर्यायावर विचार करीत आहेत; परंतु सूत्रांनुसार यासंबंधी अंतिम निर्णय काँग्रेसचे आमदार आणि अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्या घेतील. याच आठवड्यात ही चर्चा होणार आहे.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानुसार काँग्रेसच्या मंत्र्यावर पक्षाचे आमदार नाराज आहेत. कारण हे मंत्री छोटे नेते आणि कार्यकर्त्यांची उपेक्षा करतात. त्याचा परिणाम संघटनेवर होत आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना राज्यातील काही आमदारांनी पाठविलेल्या पत्रात काही निवडक मंत्र्यांबाबत तक्रार करण्यात आली आहे.  या मंत्र्यांच्या कामकाजावर नाराज असलेले जुने नेते सतीश चतुर्वेदी, विलास मुत्तेमवार, अनिस अहमद पुढाकार घेताना दिसत नाहीत. पक्ष नेतृत्वही आमच्या अनुभवाचा उपयोग करीत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

विदर्भात पक्ष मजबूत करण्यासाठी हालचालीn सतीश चतुर्वेदी हे मूूळचे उत्तर प्रदेशचे असून, ब्राह्मण समाजात त्यांचा प्रभाव आहे. n उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्यांना पुढे करून फायदा घेता आला असता. n काँग्रेस अध्यक्षांनी या सर्व तथ्यांची दखल घेतली आहे. त्या विशेषत: विदर्भात पक्ष मजबूत करण्याच्या इराद्याने काही मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीMLAआमदारcongressकाँग्रेस