शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 20:59 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ईव्हीएमबाबत लोकसभा आणि विधानसभेचे प्रश्न वेगळे आहेत, असे काँग्रेस खासदारांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याने आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, भाजपाकडून अद्याप याबाबत कोणत्याही निर्णय झालेला नाही. भाजपा धक्कातंत्राचा वापर करणार की, देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच दिल्लीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींसोबत एकनाथ शिंदे, अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित असणार आहेत. यावरून आता काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे. 

याच गोष्टीचे आश्चर्य वाटते की, पूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय व्हायचे. पण आता नवीन परंपरा सुरू झालेली आहे. दिल्लीत निर्णय होतात. दिल्लीतील दोन नेते सांगतात, ते मान्य असेल, ही भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री सांगत आहेत. मी हताश नाही, निराश नाही, असे बोलत असले, तरी चेहरा मात्र काहीतरी वेगळेच सांगत आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर अजूनही सरकार स्थापन झालेले नाही, हे पहिल्यांदाच आम्ही पाहतोय. सरकार कधी स्थापन होणार, याकडे १३ कोटी जनतेचे लक्ष लागले आहे. स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ लागत असेल, तर ही हताश करणारी गोष्ट आहे, अशी टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. 

अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा

अजित पवार अनेक वर्षे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद सांभाळत आहेत. अजित पवार सातत्याने याच पदांवर राहिलेले आहेत. आताही अजित पवार यांनी आपण उपमुख्यमंत्रीच होणार, हे स्वीकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी वेगळा अनुभव कधीतरी अनुभवावा. अजित पवार यांना शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला वर्षा गायकवाड यांनी लगावला. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडून महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना, परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. सध्यातरी आम्ही एकत्र आहोत. वैयक्तिक कोणाची मते काय आहेत, यापेक्षा पक्षाचे मत काय आहे, ते महत्त्वाचे ठरते. शिवसेना ठाकरे गट सोबत असावा, आमची काही हरकत नाही. संघटना म्हणून आम्ही एकत्र काम केले आहे. येणारा काळ ठरवेल. काळ ठरवेल, तो निर्णय मान्य, असे गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, ईव्हीएमबाबत लोकसभा आणि विधानसभेचे प्रश्न वेगळे आहेत. लोकसभा निवडणुकीवेळीही आम्ही प्रश्न मांडले होते. या विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही आत्मचिंतन करत आहोत. मायक्रो मॅनेजमेंटवर येणाऱ्या काळात काम करणार आहोत. ईव्हीएम हा आजचा विषय नाही, तो सातत्याने आम्ही मांडत आहोत. आमच्या नेत्यांनी याबाबत जी भूमिका मांडली, त्याच्याशी सहमत आहोत, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसVarsha Gaikwadवर्षा गायकवाड