शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

मध्य प्रदेशने टिकविले ओबीसी आरक्षण! सुप्रीम कोर्टाचा सरकारला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 05:30 IST

या आठवड्यात ओबीसी आरक्षण अधिसूचित करावे आणि पुढच्या आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करावी, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत. 

अभिलाष खांडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क 

भोपाळ / नवी दिल्ली :मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिले. आदेश देतानाच कोर्टाने एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे स्पष्ट केले आहे. यामुळे तेथील ओबीसी समाजाला १४ टक्के आरक्षण मिळू शकणार आहे. या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारला मोठा दिलासा मिळाला. या आठवड्यात ओबीसी आरक्षण अधिसूचित करावे आणि पुढच्या आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करावी, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत. 

यापूर्वी कोर्टाने सरकारला तीन वर्षांपासून रखडलेल्या नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश दिले होते; परंतु निवडणुका ओबीसी आरक्षणासह व्हाव्यात, अशी राज्य सरकारची इच्छा होती. त्यामुळे सरकारने निवडणुका ओबीसी आरक्षणासह व्हाव्या यासाठी कोर्टात पुनर्विलोकन याचिका १२ मे रोजी रात्री उशिरा दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे.याप्रकरणी सरकारने ओबीसी आरक्षण देण्यासाठी कोर्टात २०११ मध्ये झालेल्या जनगणनेची आकडेवारी सादर केली होती. यात मध्य प्रदेशातील ओबीसीची संख्या ५१ टक्के इतकी असल्याचे म्हटले आहे. यानुसार राज्यात आरक्षण दिले तरच ओबीसी समाजाला योग्य न्याय मिळेल, असे सरकारचे म्हणणे होते. त्याचवेळी दुसऱ्या पक्षाचे म्हणणे होते की, सरकारकडून याबाबत जरी दुर्लक्ष होत असले तरी ओबीसी समाजाला त्यांचे घटनात्मक आरक्षण मिळायलाच हवे.

आयोगाचा सुधारित अहवाल ग्राह्य

- न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने यावेळी राज्य सरकारने सादर केलेल्या मागासर्गीय आयोगाचा दुसरा सुधारित अहवाल ग्राह्य धरला आहे. 

- याआधीच सादर केलेल्या अहवालावर कोर्टाने काही आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे सरकारने सीमांकन प्रक्रिया पूर्ण करून दुसरा सुधारित अहवाल सादर केला होता.

सत्याचा विजय झाला: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान 

अखेर सत्याच्या विजय झाला आहे. याआधीही निवडणुका ओबीसी आरक्षणासह होत होत्या. काँग्रेसचे काही नेते सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे कोर्टाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते; परंतु आम्ही ओबीसी आरक्षणबाबतीत कोणतीही कसूर केली नाही.

पूर्ण लाभ मिळणार नाही: माजी मुख्यमंत्री कमलनाथ

काँग्रेस सरकारने ओबीसींचे आरक्षण १४ टक्केवरून २७ टक्के इतके केले होते. आजच्या निर्णयामुळे ओबीसींना आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे स्पष्टपणे सांगितलेले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयOBC Reservationओबीसी आरक्षणMadhya Pradeshमध्य प्रदेश