शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

काँग्रेस सरकारांचं सॉफ्ट हिंदुत्व; मध्य प्रदेश, राजस्थानच्या अर्थसंकल्पात गोरक्षेला महत्त्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 16:03 IST

मध्य प्रदेश, राजस्थान सरकारचे अर्थसंकल्प सादर

जयपूर/भोपाळ: मध्य प्रदेशातील कमलनाथ आणि राजस्थानमधील गेहलोत सरकारनं सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी नंदी गाय आश्रयांची स्थापना करण्याची घोषणा केली. तर मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारनं आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात गोशाळेसोबतच 'राम वन गमन पथ' विकसित करण्याची घोषणा केली.  राजस्थान विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं जाहीरनाम्यात पशू कल्याणासोबतच गोशाळा स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळेच मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्यांच्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात भटक्या जनावरांच्या देखभालीसाठी प्रत्येक ग्राम पंचायतीत नंदी गाय आश्रयांची स्थापना करण्याची घोषणा केली. भटक्या जनावरांमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आलेले असून त्यांच्याकडून वारंवार आंदोलनं केली जात होती. मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारनंदेखील आज पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री तरुण भनोत यांनी अर्थसंकल्पातून सॉफ्ट हिंदुत्व अधोरेखित केलं. भनोत यांनी गोरक्षणासाठी १३०९ कोटींची तरतूद केली. राज्यातील प्रत्येक गावात गोशाळा उभारण्याची घोषणा त्यांनी केली. मंदिरांच्या जमिनीवर सरकारी निधीतून गोशाळा बांधल्या जाणार आहेत.  

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान