शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आधी होकार, मग नकार; 'त्या' यू-टर्नमुळे कोसळणार काँग्रेस सरकार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 20:23 IST

भोपाळला परतण्याच्या तयारीत असलेले आमदार विमानतळावरुन माघारी; काँग्रेसला मोठा धक्का

ठळक मुद्देभोपाळला परतण्यासाठी निघालेले आमदार विमानतळावरुन माघारीआमदारकीचा राजीनामा दिलेल्या सदस्यांचा बंगळुरूतला मुक्काम वाढलाबंगळुरूच्या विमानतळावर पोहोचलेले आमदार पुन्हा रिसॉर्टला रवाना

भोपाळ: मध्य प्रदेशमधलं सत्ता नाट्य अद्यापही सुरूच आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचा काँग्रेसला रामराम, त्यानंतर त्यांच्या समर्थक आमदारांनी दिलेले राजीनामे यामुळे राज्यातलं काँग्रेस सरकार अडचणीत सापडलं आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक आमदार सध्या बंगळुरूत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे आमदार भोपाळला परतण्यास तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. सिंधिया समर्थक १९ आमदार सध्या बंगळुरूतल्या एका रिसॉर्टमध्ये आहेत. त्यांना मध्य प्रदेशात आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. आज हे आमदार भोपाळला परतण्यासाठी रिसॉर्टहून केम्पेगौडा विमानतळाच्या दिशेनं निघाले होते. मात्र तिथून ते पुन्हा रिसॉर्टवर परतले. या आमदारांना बंगळुरूहून आणण्यासाठी काँग्रेसनं पूर्ण तयारी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र विमानतळाहून आमदार पुन्हा रिसॉर्टला गेल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला. सरकार वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसनं आमदारांना परत आणण्यासाठी भोपाळच्या राजा भोज विमानतळावर एका विशेष बसची व्यवस्था केली होती. मात्र हे आमदार बंगळुरूतल्या विमानतळावरूनच पुन्हा रिसॉर्टला परतल्यानं ही बसदेखील रिकामी परतली. मध्य प्रदेशात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा आमदारांनी केला आहे. तशी माहिती त्यांनी मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक यांनाही कळवली आहे.ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी (१० मार्चला) त्यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामे दिले. सिंधिया यांचे १९ समर्थक आमदार सध्या बंगळुरूत आहेत. यातले सहा जण कमलनाथ सरकारमध्ये मंत्री आहेत. या सगळ्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र यातल्या एकाचाही राजीनामा मंजूर झालेला नाही.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा