शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

कुणाचे ५, तर कुणाचे १३ रुपये माफ; मध्य प्रदेशात शेतकरी कर्जमाफीचा फार्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 15:00 IST

मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यावर काँग्रेसने तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करत निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली होती.

ठळक मुद्देमध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यावर काँग्रेसने तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलीसरकारी बँकांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाल्याने शेतकरी त्रस्तकाही शेतकऱ्यांना मिळाली किरकोळ कर्जमाफी

भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यावर काँग्रेसने तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करत निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली होती. आता सरकारने आणलेल्या जय किसान कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकरी अर्ज भरत आहेत. मात्र या कर्जमाफीचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या ज्या याद्या लावण्यात आल्या आहेत. त्यावरून शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या नावासमोर 30 रुपये तर काहींच्या नावासमोर वालासमोर 100 रुपये माफ झाल्याचे दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, सरकारी बँकांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना इंग्रजी वाचता येत नसल्याने कर्जमाफी झालेल्यांमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे जाणून घेण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. निपानीया येथील शिवलाल आणि शिवनारायण हे दोन शेतकरी आपली बँक पासबूक घेऊन सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. दोन्ही शेतकऱ्यांवर 20 हजार पेक्षा अधिक कर्ज आहे. मात्र त्यांचे केवळ 13 रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. जर सरकार कर्ज माफ करत असेल तर पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, 13 रुपये 5 रुपये एवढ्या पैशांची तर आम्ही विडी पितो, अशा शब्दात या शेतकऱ्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. मध्य प्रदेशमधील खरगौन येथील शेतकरीसुद्धा या किरकोळ कर्जमाफीमुळे त्रस्त आहेत. येथील अनेक शेतकऱ्यांचे 25, 50, 150, 180 आणि 300 रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाले आहे. मुख्यमंत्री कमनलाथ यांच्या छिंडवाडा मतदारसंघातील हमीद खाँ यांच्या नावावर दहा हजार रुपयांचे कर्ज आहे. मात्र त्यापैकी केवळ 232 रुपयांचे कर्जमाफ झाले आहे. तर माळवा येथील नारायण सिंह यांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पण पण त्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ झाल्याचे समोर आले आहे.  दरम्यान, बँकांकडे हिंदी सॉफ्टवेअर नसल्याने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीतून प्रसिद्ध केली, असा दावा बँक अधिकाऱ्यांनी केला आहे. कर्जामाफीच्या या गोंधळावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. हे सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देत आहे. याचे परिणाम कांग्रेसला लोकसभा निवडणुकीत भोगावे लागतील, असे भाजपाने म्हटले आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस