शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

कुणाचे ५, तर कुणाचे १३ रुपये माफ; मध्य प्रदेशात शेतकरी कर्जमाफीचा फार्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 15:00 IST

मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यावर काँग्रेसने तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करत निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली होती.

ठळक मुद्देमध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यावर काँग्रेसने तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलीसरकारी बँकांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाल्याने शेतकरी त्रस्तकाही शेतकऱ्यांना मिळाली किरकोळ कर्जमाफी

भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यावर काँग्रेसने तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करत निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली होती. आता सरकारने आणलेल्या जय किसान कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकरी अर्ज भरत आहेत. मात्र या कर्जमाफीचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या ज्या याद्या लावण्यात आल्या आहेत. त्यावरून शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या नावासमोर 30 रुपये तर काहींच्या नावासमोर वालासमोर 100 रुपये माफ झाल्याचे दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, सरकारी बँकांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना इंग्रजी वाचता येत नसल्याने कर्जमाफी झालेल्यांमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे जाणून घेण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. निपानीया येथील शिवलाल आणि शिवनारायण हे दोन शेतकरी आपली बँक पासबूक घेऊन सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. दोन्ही शेतकऱ्यांवर 20 हजार पेक्षा अधिक कर्ज आहे. मात्र त्यांचे केवळ 13 रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. जर सरकार कर्ज माफ करत असेल तर पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, 13 रुपये 5 रुपये एवढ्या पैशांची तर आम्ही विडी पितो, अशा शब्दात या शेतकऱ्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. मध्य प्रदेशमधील खरगौन येथील शेतकरीसुद्धा या किरकोळ कर्जमाफीमुळे त्रस्त आहेत. येथील अनेक शेतकऱ्यांचे 25, 50, 150, 180 आणि 300 रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाले आहे. मुख्यमंत्री कमनलाथ यांच्या छिंडवाडा मतदारसंघातील हमीद खाँ यांच्या नावावर दहा हजार रुपयांचे कर्ज आहे. मात्र त्यापैकी केवळ 232 रुपयांचे कर्जमाफ झाले आहे. तर माळवा येथील नारायण सिंह यांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पण पण त्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ झाल्याचे समोर आले आहे.  दरम्यान, बँकांकडे हिंदी सॉफ्टवेअर नसल्याने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीतून प्रसिद्ध केली, असा दावा बँक अधिकाऱ्यांनी केला आहे. कर्जामाफीच्या या गोंधळावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. हे सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देत आहे. याचे परिणाम कांग्रेसला लोकसभा निवडणुकीत भोगावे लागतील, असे भाजपाने म्हटले आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस