शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

...तेव्हा तेव्हा राज्य सरकार संकटात सापडेल; काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 08:09 IST

मध्य प्रदेशातल्या काँग्रेस सरकारसमोरील अडचणी कायम

ठळक मुद्देज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थक आमदाराचा सूचक इशाराकमलनाथ सरकारसमोरील अडचमी कायमदिल्लीला गेलेले १० पैकी ६ आमदार परतले; ४ जण अद्याप नॉट रिचेबल

भोपाळ: मध्य प्रदेशमधल्या काँग्रेस सरकारचा धोका अद्याप टळलेला नाही. मंगळवारी रात्री अचानक दिल्लीला गेलेल्या काँग्रेस आघाडीतल्या १० आमदारांपैकी बरेचसे आमदार माघारी परतले असले तरी कमलनाथ सरकारसमोरील अडचणी संपलेल्या नाहीत. कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळातल्या एका सहकाऱ्यानंच सरकार संकटात सापडू शकतं, असं म्हणत सरकारच्या भवितव्यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मध्य प्रदेशात आणखी राजकीय घडामोडी घडू शकतात. कामगार मंत्री महेंद्र सिंह सिसोदिया यांनी कमलनाथ सरकारच्या भवितव्याबद्दल अतिशय सूचक भाष्य केलं आहे. 'सरकारकडून जेव्हा जेव्हा आमचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची उपेक्षा केली जाईल, त्यांचा अपमान करण्यात येईल, तेव्हा तेव्हा सरकार संकटात सापडेल आणि त्यावेळी जे काय होईल, ते मी आत्ताच सांगू शकत नाही,' असं सिसोदिया एएनआयशी संवाद साधताना म्हटलं. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी रात्री काँग्रेस आघाडीतले दहा आमदार दिल्लीला रवाना झाले. हे आमदार दुसऱ्या दिवशी भाजपाच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार होते. मात्र एका आमदाराच्या गनमॅननं केलेल्या फोनमुळे ही बातमी फुटली. यानंतर काँग्रेसनं वेगवान हालचाली सुरू केल्या. काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी दिल्लीला रवाना झाले. ते काँग्रेस आघाडीतल्या आमदारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलात पोहोचले. यानंतर आघाडीतल्या दहापैकी सहा आमदारांनी भोपाळला परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कमलनाथ यांना दिलासा मिळाला. दिल्लीहून भोपाळमध्ये परतलेल्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेतली. मात्र उर्वरित चार आमदार बंगळुरूत असल्याची चर्चा आहे. अपक्ष आमदार सुरेंद्र सिंह शेरा यांनी आपण बंगळुरूत असल्याचं स्वत:चं सांगितलं आहे. याशिवाय काँग्रेस आमदार बिसाहूलाल सिंह, हरदीप सिंग डंग, रघुराज कंसानादेखील माघारी परतलेले नाहीत. गुरुवारी दुपारपर्यंत हे आमदार चार्टर्ड विमानानं भोपाळला पोहोचतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अद्याप तरी या आमदारांनी भोपाळ गाठलेलं नाही. यापैकी हरदीप सिंह डंग यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा