शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 17:30 IST

मध्यप्रदेशात एकाच वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमितांवर झालेल्या अंत्यसंस्कारामुळे  प्रशासनही भांबावले आहे. लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. (CoronaVirus)

भोपाळ - कोरोना व्हायरसने मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) प्रचंड थैमान घातले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत असून वैद्यकीय साधनांचीही कमतरता भासू लागली आहे. राजधानी भोपाळमध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. गेल्या 24 तासांत भोपाळमध्ये 1681 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 112 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र, सरकारी रेकॉर्डवर केवळ 4 जणांचाच मृत्यू झाला आहे. (Madhya Pradesh CoronaVirus 112 dead bodies cremated in bhopal)

मध्यप्रदेशात एकाच वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमितांवर झालेल्या अंत्यसंस्कारामुळे  प्रशासनही भांबावले आहे. लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. भोपाळमधील पॉझिटिव्हिटी रेट 29 टक्क्यांच्याही वर पोहोचला आहे. भोपाल, जबलपूर, इंदूर आणि ग्वाल्हेर येथे अंत्य संस्कारासाठी अक्षरशः वाट पाहावी लागत आहे. स्मशान भूमीवत एका पाठोपाठ एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. 

CoronaVirus : कुंभमेळ्यात कुणामुळे पसरला कोरोना? आता आखाडेच आले 'आमने-सामने'

एका दिवसातील मृतांची संख्या संख्या 100 पार -भोपाळच्या सुभाष नगर विश्रामघाटावर गुरुवारी 50 मृतदेह आले. यांतील 30 मृतदेहांवर कोरोना प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. भदभदा विश्रामघाटावर 88 मृतदेह आले. यांतील 72 जणांवर कोरोना प्रोटेकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, झदा कब्रस्तान येथेही 17 पैकी 10 मृतदेह कोविड प्रोटोकॉल प्रमाणे दफन करण्यात आले. म्हणजेच एकूण 112 मृतदेहांवर कोरोना प्रोटोकॉल प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

काँग्रेसचा सरकारवर आकडे लपवण्याचा आरोप - कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीत गडबड झाल्याचे समोर आले आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाचीही झोप उडाली आहे. एवढेच नाही, तर यामुळे सरकारवही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यातच विरोधक सरकारवर सातत्याने मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप करत आहेत. काँग्रेस नेते अजय सिंह यादव यांनी सरकारवर मृतांच्या आकडेवारीत हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. हे सरकार कोरोनाच्या बाबतीत गंभीर नाही, असे अजय सिंह यांनी म्हटले आहे. तर, आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी विरोधकांच्या प्रश्नावर पलटवार करत, सरकार मृतांचा आकडा लपवत नाही. तसेच ज्या लोकांवर अंत्यसंस्कार केला जात आहे. त्यांनाही संशयित मानले जात आहे, असे सारंग यांनी म्हटले आहे. 

CoronaVirus Update: कोरोनाचा कहर! देशात 24 तासांत 217353 नवे रुग्ण, 1185 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती सर्वात वाईट

24 तासांत 10 हजारहून अधिक केस -राज्यात गुरुवारी 10,166 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 53 जणांचा मृत्यू झाला आहे. याच बरोबर, 3,970 जणांनी कोरोनावर मात केली आहे. येथे आतापर्यंत 3.73 लाख सक्रीय रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 3.13 लाख रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानcongressकाँग्रेसBJPभाजपा