शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Madhya Pradesh Assembly Election 2018 : 'EVM ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे बंद होते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 08:45 IST

Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमधील निवडणुकीतील निकाल बदलवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे छड़यंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर भोपाळमध्ये ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले होते, तेथील वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास तासभर बंद होते, ही बाब निवडणूक आयोगानंही मान्य केली आहे. 

ठळक मुद्देभाजपाकडून EVMमध्ये छेडछाडीचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे तासभर होते बंद - निवडणूक आयोगस्टाँग रुमबाहेर निवडणूक आयोगाचा कडक पहारा तैनात

भोपाळ -  मध्य प्रदेशमधील निवडणुकीतील निकाल बदलवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे छड़यंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर भोपाळमध्ये ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले होते, तेथील वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास तासभर बंद होते, ही बाब निवडणूक आयोगानंही मान्य केली आहे. याबाबत निवडणूक आयोगानं म्हटलंय की, सागरमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्णतः पार पडल्यानंतर दोन दिवसांनंतर ईव्हीएम जमा केल्याप्रकरणी एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. भोपाळ आणि सागरमधील प्रकरण समोर आल्यानंतर ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. 

(भाजपाकडून EVM मध्ये छेडछाड होण्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांना शंका)

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार 30 नोव्हेंबरला वीज पुरवठा खंडीत झाल्यानं स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि एलईडी डिस्पले सकाळी 8.19 वाजल्यापासून ते सकाळी 9.35 वाजेपर्यंत बंद होते. या कारणामुळे कोणतेही रेकॉर्डिंग होऊ शकले नाही. यानंतर एक अतिरिक्त एलईडी स्क्रीन, इनर्व्हटर आणि जेनरेटरची व्यवस्था करण्यात आली.  

निवडणूक आयोगाकडून असंही सांगण्यात आले आहे की, आता सर्व कॅमेरे व्यवस्थित काम करत आहेत आणि चोख सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. स्ट्राँग रुमच्या उघडे ठेवण्यात आलेल्या एका दाराबाबतही काँग्रेसनं तक्रार केली होती. काँग्रेसच्या तक्राराची गांभीर्यानं दखल घेत हे दार तातडीनं बंद केले.  

(EVM वर संशय, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे घेतली धाव)

जनमताच्या कौल बदलवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते, अशी भीती काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना वाटत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमवर कडेकोट पहारा द्यावा, अशी मागणी केली होती.  कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलेल्या ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा आरोपही ज्योतिरादित्य यांनी केला आहे.

''भाजपाला आपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे लोकशाही आणि जनमत यांना पायदळी तुडवण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. हा सरकारी संरक्षणाखाली लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने लवकरात लवकर कठोर पावले उचलून दोषींवर कारवाई करून ईव्हीएमच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असेही सिंधिया यांनी म्हटले होते.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश