शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh Assembly Election 2018 : 'EVM ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे बंद होते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 08:45 IST

Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमधील निवडणुकीतील निकाल बदलवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे छड़यंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर भोपाळमध्ये ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले होते, तेथील वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास तासभर बंद होते, ही बाब निवडणूक आयोगानंही मान्य केली आहे. 

ठळक मुद्देभाजपाकडून EVMमध्ये छेडछाडीचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे तासभर होते बंद - निवडणूक आयोगस्टाँग रुमबाहेर निवडणूक आयोगाचा कडक पहारा तैनात

भोपाळ -  मध्य प्रदेशमधील निवडणुकीतील निकाल बदलवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे छड़यंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर भोपाळमध्ये ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले होते, तेथील वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास तासभर बंद होते, ही बाब निवडणूक आयोगानंही मान्य केली आहे. याबाबत निवडणूक आयोगानं म्हटलंय की, सागरमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्णतः पार पडल्यानंतर दोन दिवसांनंतर ईव्हीएम जमा केल्याप्रकरणी एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. भोपाळ आणि सागरमधील प्रकरण समोर आल्यानंतर ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. 

(भाजपाकडून EVM मध्ये छेडछाड होण्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांना शंका)

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार 30 नोव्हेंबरला वीज पुरवठा खंडीत झाल्यानं स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि एलईडी डिस्पले सकाळी 8.19 वाजल्यापासून ते सकाळी 9.35 वाजेपर्यंत बंद होते. या कारणामुळे कोणतेही रेकॉर्डिंग होऊ शकले नाही. यानंतर एक अतिरिक्त एलईडी स्क्रीन, इनर्व्हटर आणि जेनरेटरची व्यवस्था करण्यात आली.  

निवडणूक आयोगाकडून असंही सांगण्यात आले आहे की, आता सर्व कॅमेरे व्यवस्थित काम करत आहेत आणि चोख सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. स्ट्राँग रुमच्या उघडे ठेवण्यात आलेल्या एका दाराबाबतही काँग्रेसनं तक्रार केली होती. काँग्रेसच्या तक्राराची गांभीर्यानं दखल घेत हे दार तातडीनं बंद केले.  

(EVM वर संशय, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे घेतली धाव)

जनमताच्या कौल बदलवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते, अशी भीती काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना वाटत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमवर कडेकोट पहारा द्यावा, अशी मागणी केली होती.  कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलेल्या ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा आरोपही ज्योतिरादित्य यांनी केला आहे.

''भाजपाला आपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे लोकशाही आणि जनमत यांना पायदळी तुडवण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. हा सरकारी संरक्षणाखाली लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने लवकरात लवकर कठोर पावले उचलून दोषींवर कारवाई करून ईव्हीएमच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असेही सिंधिया यांनी म्हटले होते.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश