शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लव्ह जिहाद : भाजपाचा सामाजिक सौहार्द नष्ट करण्याचा प्रयत्न, सर्वोच्च न्यायालयात वकिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 09:49 IST

केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणावर सुरू असलेल्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (9 ऑक्टोबर) चांगलीच खडाजंगी रंगली. भारतीय जनता पार्टी केरळमधील सामाजिक सौहार्द नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे.

नवी दिल्ली - केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणावर सुरू असलेल्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (9 ऑक्टोबर) चांगलीच खडाजंगी रंगली. भारतीय जनता पार्टी केरळमधील सामाजिक सौहार्द नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. याबरोबरच एकापाठोपाठ एक आरोप करणा-या वकील दुष्यंत दवे यांना मध्येच थांबवून त्यांच्यावर न्यायाधीशांना नाराजी व्यक्त करावी लागली. दुष्यंत दवे यांनी सोमवारी त्यांचे अशिल शाफिन जहान व अखिला यांच्या विवाहाला भाजपाने लव्ह जिहाद संबोधून केरळमधील सामाजिक सौहार्द नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप केला. आपल्या युक्तिवादात दवे यांनी केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही सोडले नाही.

उच्च न्यायालयाने या विवाहाची मान्यता रद्द करून मुलीस पालकांकडे पुन्हा सोपवल्याबद्दल तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचा समावेश बंधनकारक असूनही एनआयएनं चौकशी केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. तसेच या परिस्थितीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केरळला भेट देऊन सामाजिक सौहार्द संपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप दवे यांनी केला. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात केरळच्या सर्वसमावेशक संस्कृतीचे कौतुक केले होते. त्याच्या विपरीत योगी यांनी वर्तन केले असेही तो म्हणाले.

अॅडिशनल सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग यांनी "एनआयएच्या तपासात अशा प्रकारे हिंदू मुलींचे ब्रेन वॉशिंग करुन त्यांच्याशी मुस्लिम विवाह करत असल्याचे आढळल्याची" बाजू व्यक्त केली होती त्यावर दवे बोलत होते. याबाबत कोर्टाचे मत ऐकण्याआधीच बोलणा-या दवे यांचा युक्तीवाद सुरू असताना मध्येच सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांनी त्यांना थांबवून नाराजी व्यक्त केली.

आपली मुलगी कोठे आहे याची माहिती नाही अशा पालकांच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाला अशा प्रकारे विवाह रद्द करण्याचा कायदेशीर व तार्किक उत्तरे खंडपीठ शोधत आहे. मात्र तुम्ही थेट उत्तर देण्याऐवजी इकडच्या तिकडच्या गोष्टींवर बोलत आहात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर आरोप करत आहात, अनेक व्यक्तींची नावे घेऊन त्यांना मध्ये आणत आहात. तुमच्याकडून अपेक्षा नाही अशा शब्दांमध्ये खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. राजकीय व्यक्तींना पुरावा असल्याशिवाय यामध्ये आणू नका असे सांगून खंडपीठाने 30 ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपा