शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 250 रुपयांमुळे मुख्यमंत्रीपद गमावलं, मिश्रांचं राजकीय आयुष्यच बदललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 09:03 IST

दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशच्या राजकारणाची गणितच बदलली. कमलनारायण शर्मा यांच्या याचिकेवर निर्णय झाला. त्यानुसार, द्वारका प्रसाद मिश्रा यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या कसडोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचे उघड झाले.

ठळक मुद्देमध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेशचंद्र सिंह यांनी 25 मार्च 1969 रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी, आता द्वारका प्रसाद मिश्रा हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी बातमी सगळीकडे पसरली.

भोपाळ - डीपी मिश्रा म्हणजे द्वारका प्रसाद मिश्रा हे मध्य प्रदेशच्या राजकारणातील मोठं नाव. मध्य प्रदेशच्यामुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही मिश्र यांनी सांभाळली होती. मात्र, केवळ 249. रुपये 72 पैशांसाठी त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद गमावलं होतं. वासुदेव चंद्राकर यांच्या जीवनी नामक पुस्तकात यासंदर्भातील किस्सा सांगण्यात आला आहे. रामप्यारा पारकर, आगासदिया आणि डॉ. परदेशीराम वर्मा हे या पुस्तकाचे लेखक आहेत. 

मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेशचंद्र सिंह यांनी 25 मार्च 1969 रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी, आता द्वारका प्रसाद मिश्रा हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी बातमी सगळीकडे पसरली. कारण, काँग्रेसचे संपूर्ण नियंत्रण मिश्रा यांच्याकडेच होते. नरेंशचंद्र सिंह हे मध्य प्रदेशचे सर्वात पहिले आणि एकमवेत आदिवासी मुख्यमंत्री होते, जे केवळ 13 दिवसच या पदावर राहिले. सिंह यांनी 14 व्या दिवशी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला अन् त्यानंतर एकप्रकारे सन्यासच घेतला. 

दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशच्या राजकारणाची गणितच बदलली. कमलनारायण शर्मा यांच्या याचिकेवर निर्णय झाला. त्यानुसार, द्वारका प्रसाद मिश्रा यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या कसडोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचे उघड झाले. त्यामुळे, ही निवडणूक अवैध घोषित करण्यात आली. कमलनारायण यांनी डीपी मिश्रा यांच्याविरुद्ध सबळ पुरावा मिळाला होता. डिपी मिश्रा यांच्या निवडणुकांचे एंजट हे श्यामशरण शुक्ल हे होते. मिश्रा यांनी निवडणूक जिकंली, पण त्यांच्या निवडणूक खर्चाची काही बिले गहाळ झाली होती. 

कमलनारायण शर्मा यांनी या निवणुकीविरुद्ध याचिका दाखल केली. त्यावेळी, शर्मा यांना 6300 रुपयाचे एक बिल मिळाले होते, ज्यावर एजंट श्यामशरण शुक्ल यांचे हस्ताक्षर होते. विशेष म्हणजे शुक्ल यांनीची शर्मा यांना हा महत्त्वाचा ऐवज दिल्याचेही सांगण्यात येते. न्यायालयाने ही पोटनिवडणूक रद्दबातल ठरवली. कारण, द्वारका प्रसाद मिश्रा यांनी निवडणूक आयोगाकडे दाखवलेल्या खर्चापेक्षा 249 रुपये 72 पैसे अधिक खर्च केले होते. जबलपूर उच्च न्यायालयाने डीपी मिश्रा यांना पुढील 6 वर्षांसाठी निवडणुकांसाठी अपात्र ठरवले. कोर्टाच्या या निर्णयाने डीपी मिश्रा यांचे राजकीय आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर, ते इंदिरा गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून कार्यरत राहिले.  

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्री