शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

केवळ 250 रुपयांमुळे मुख्यमंत्रीपद गमावलं, मिश्रांचं राजकीय आयुष्यच बदललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 09:03 IST

दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशच्या राजकारणाची गणितच बदलली. कमलनारायण शर्मा यांच्या याचिकेवर निर्णय झाला. त्यानुसार, द्वारका प्रसाद मिश्रा यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या कसडोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचे उघड झाले.

ठळक मुद्देमध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेशचंद्र सिंह यांनी 25 मार्च 1969 रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी, आता द्वारका प्रसाद मिश्रा हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी बातमी सगळीकडे पसरली.

भोपाळ - डीपी मिश्रा म्हणजे द्वारका प्रसाद मिश्रा हे मध्य प्रदेशच्या राजकारणातील मोठं नाव. मध्य प्रदेशच्यामुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही मिश्र यांनी सांभाळली होती. मात्र, केवळ 249. रुपये 72 पैशांसाठी त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद गमावलं होतं. वासुदेव चंद्राकर यांच्या जीवनी नामक पुस्तकात यासंदर्भातील किस्सा सांगण्यात आला आहे. रामप्यारा पारकर, आगासदिया आणि डॉ. परदेशीराम वर्मा हे या पुस्तकाचे लेखक आहेत. 

मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेशचंद्र सिंह यांनी 25 मार्च 1969 रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी, आता द्वारका प्रसाद मिश्रा हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी बातमी सगळीकडे पसरली. कारण, काँग्रेसचे संपूर्ण नियंत्रण मिश्रा यांच्याकडेच होते. नरेंशचंद्र सिंह हे मध्य प्रदेशचे सर्वात पहिले आणि एकमवेत आदिवासी मुख्यमंत्री होते, जे केवळ 13 दिवसच या पदावर राहिले. सिंह यांनी 14 व्या दिवशी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला अन् त्यानंतर एकप्रकारे सन्यासच घेतला. 

दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशच्या राजकारणाची गणितच बदलली. कमलनारायण शर्मा यांच्या याचिकेवर निर्णय झाला. त्यानुसार, द्वारका प्रसाद मिश्रा यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या कसडोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचे उघड झाले. त्यामुळे, ही निवडणूक अवैध घोषित करण्यात आली. कमलनारायण यांनी डीपी मिश्रा यांच्याविरुद्ध सबळ पुरावा मिळाला होता. डिपी मिश्रा यांच्या निवडणुकांचे एंजट हे श्यामशरण शुक्ल हे होते. मिश्रा यांनी निवडणूक जिकंली, पण त्यांच्या निवडणूक खर्चाची काही बिले गहाळ झाली होती. 

कमलनारायण शर्मा यांनी या निवणुकीविरुद्ध याचिका दाखल केली. त्यावेळी, शर्मा यांना 6300 रुपयाचे एक बिल मिळाले होते, ज्यावर एजंट श्यामशरण शुक्ल यांचे हस्ताक्षर होते. विशेष म्हणजे शुक्ल यांनीची शर्मा यांना हा महत्त्वाचा ऐवज दिल्याचेही सांगण्यात येते. न्यायालयाने ही पोटनिवडणूक रद्दबातल ठरवली. कारण, द्वारका प्रसाद मिश्रा यांनी निवडणूक आयोगाकडे दाखवलेल्या खर्चापेक्षा 249 रुपये 72 पैसे अधिक खर्च केले होते. जबलपूर उच्च न्यायालयाने डीपी मिश्रा यांना पुढील 6 वर्षांसाठी निवडणुकांसाठी अपात्र ठरवले. कोर्टाच्या या निर्णयाने डीपी मिश्रा यांचे राजकीय आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर, ते इंदिरा गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून कार्यरत राहिले.  

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्री