शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मिठाईबाबतचा नवा नियम जाणून घ्या अन् बिनधास्त तोंड गोड करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 13:38 IST

मिठाई घेताना टेन्शन घेण्याची गरज नाही कारण मिठाई विकत घेताना त्याची एक्स्पायरी डेट ग्राहकांना समजणार आहे.

ठळक मुद्देमिठाई घेताना टेन्शन घेण्याची गरज नाही कारण मिठाई विकत घेताना त्याची एक्स्पायरी डेट ग्राहकांना समजणार आहे.FSSAI ने याबाबत आदेश काढला असून 1 जून 2020 पासून तो लागू होणार आहे. मिठाईवाल्यांना सुटी मिठाई कधी तयार केली याची माहिती द्यावीच लागणार.

नवी दिल्ली - सण, समारंभ अथवा घरामध्ये एखादं शुभ कार्य असल्यास तोंड गोड करण्यासाठी हमखास मिठाई आणली जाते. मात्र अनेकदा मिठाईमध्ये भेसळ असणं किंवा ती जुनी असल्याने तशी मिठाई खाणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. मात्र आता मिठाई घेताना टेन्शन घेण्याची गरज नाही कारण मिठाई विकत घेताना त्याची एक्स्पायरी डेट ग्राहकांना समजणार आहे. तसेच मिठाई कधी तयार करण्यात आली आणि ती कधीपर्यंत खाणं योग्य आहे याबाबतची सर्व माहिती ही लवकरच ग्राहकांना मिळणार आहे. 

सुट्या किंवा पॅकबंद नसलेल्या मिठाईच्या दर्जाबाबत ग्राहकांना माहिती मिळावी यासाठी सरकारने अशी पावलं उचल्याची माहिती मिळत आहे. FSSAI ने याबाबत आदेश काढला असून 1 जून 2020 पासून तो लागू होणार आहे. त्यामुळे मिठाईवाल्यांना सुटी मिठाई कधी तयार केली याची माहिती द्यावीच लागणार आहे. त्याशिवाय त्यांना मिठाई विकता येणार नाही. पॅकबंद नसलेल्या गोड पदार्थांची विक्री करताना ते पदार्थ कधी तयार केले याची तारीख तसेच किती तारखेपर्यंत वापरावेत याचा ठळक उल्लेख करणे. FSSAI बंधनकारक केले आहे. 

अनेकदा मुदत संपलेल्या वस्तू या विकल्या जातात. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या या निर्माण होऊ शकतात. हाच धोका लक्षात घेऊन FSSAI ने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांच्या हितासाठी देशातील सर्व मिठाई विक्रेत्यांना ही मिठाई कधी तयार केली व किती तारखेपर्यंत वापरता येतील, या दोन्ही तारखांचा उल्लेख त्या पदार्थांच्या दुकानात मांडल्या जाणाऱ्या ट्रेवर ठळकपणे नमूद करणे बंधनकारक राहणार आहे. 

जगातल्या सर्वात हलक्या मिठाईचं वजन तुम्हाला माहीत आहे का?मिठाईच्या शौकीनांना नेहमीच मिठाईंबाबतच्या वेगवेगळ्या गोष्टींची उत्सुकता असते. अशीच मिठाईबाबतची एक खास बाब आम्ही त्यांच्यासाठी घेऊन आलो आहोत. अनेकांना माहीत नसेल की, जगातल्या सर्वात हलक्या मिठाईचं वजन किती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सर्वात हलक्या मिठाईचं वजन केवळ 1 ग्रॅम आहे आणि यात 90 टक्के केवळ हवा आहे. म्हणजे या मिठाईने तोंड गोड करण्यासाठी यात केवळ 4 टक्के पदार्थ टाकले आहेत. ब्रिटनच्या कारागिरांनी ही मिठाई तयार केली आहे. खास बाब ही आहे की, या मिठाईला तयार करण्यासाठी वैज्ञानिकांची खास मदत घेण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू

Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण  

Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागfoodअन्न