शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

राज्यातील अनेक रेल्वेमार्गांना करावी लागणार प्रदीर्घ प्रतीक्षा

By admin | Updated: April 25, 2015 04:40 IST

महाराष्ट्रातील अनेक पूर्ण किंवा आंशिक स्वरूपातील रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाने निधी मंजूर केला असला, तरी या प्रकल्पांचे काम नेमके केव्हा पूर्ण होईल, हे सांगण्यास नकार दिला आहे.

जयशंकर गुप्त/नितीन अग्रवाल ,नवी दिल्लीमहाराष्ट्रातील अनेक पूर्ण किंवा आंशिक स्वरूपातील रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाने निधी मंजूर केला असला, तरी या प्रकल्पांचे काम नेमके केव्हा पूर्ण होईल, हे सांगण्यास नकार दिला आहे. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी राज्यसभेत खा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात सांगितले की, महाराष्ट्रात ८,७३६ कोटी रुपये खर्चून पूर्ण अथवा आंशिक रेल्वेमार्ग आणि रुंदीकरणाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यावर दर्डा यांनी महाराष्ट्रातील एकूण किती रेल्वे प्रकल्प सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत, राज्यात नवे रेल्वेमार्ग आणि रुंदीकरणाशी संबंधित किती योजना सुरू करण्यात आल्या, राज्यात किती रेल्वेमार्ग सहभागातून निर्माण होत आहेत आणि ते केव्हापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे; याशिवाय यासाठी किती पैसा खर्च करण्याचा प्रस्ताव आहे, आदी माहिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.याबाबत सविस्तर माहिती देताना सिन्हा यांनी सांगितले, की नागपूर-नागभीड (१०६ किमी) रुंदीकरण आणि कऱ्हाड-चिपळूण (११२ किमी) नवा मार्ग हे दोन प्रकल्प २०१३-१४ आणि २०१५-१६च्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आले आहेत. परंतु त्यांना सरकारची सहमती आवश्यक आहे. चार नव्या मार्गांपैकी अहमदाबाद-बीड-परळी वैजनाथ, वडसा-गडचिरोली आणि यवतमाळ-पुसदमार्गे वर्धा-नांदेड या तीन प्रकल्पांचे काम महाराष्ट्र सरकारसोबत आर्थिक सहभागातून सुरू करण्यात आले आहे. तर बारामती- लोणंद प्रकल्पाचा पूर्ण खर्च रेल्वे करणार आहे. नव्या मार्गांसाठी निधीचे वाटप दरवर्षी संसदेच्या मंजुरीने केले जात असते. उपलब्ध निधी, प्राधान्यक्रम, भूसंपादनाची स्थिती, इतर मंजुरी आणि प्रकल्पाचा टप्पा यानुसार हा निधी दिला जात असतो. निर्माणाधीन प्रकल्पांची प्रचंड थकबाकी, नव्या रेल्वे मार्गांसाठी मर्यादित निधी याशिवाय रेल्वेच्या अखत्यारित नसलेले भूसंपादन, वनविभागाची मंजुरी, कायदा व व्यवस्था आदी कारणांमुळे हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करणे शक्य नाही. तत्पूर्वी लोकसभेत सिन्हा यांनी अशोक चव्हाण, गजानन किर्तीकर आणि संजयकाका पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वडसा-गडचिरोली आणि यवतमाळ पुसदमार्गे वर्धा-नांदेड रेल्वेमार्गांसोबतच ३३९ किमी लांब मनमाड-इंदूर, २६६ किमी पुणे-नाशिक, ११२ किमी कऱ्हाड-चिपळूण आणि ७० किमीचा गडचांदूर-आदिलाबाद रेल्वेमार्गाचेही सर्वेक्षण करण्यात आले आहे. या रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी लागणारा खर्च संयुक्तपणे वाटून घेण्यास राज्य सरकारने सहमती दर्शविली परंतु हे प्रकल्प रेल्वेच्या प्राधान्यक्रमावर नाहीत असे स्पष्ट केले होते.