शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
2
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
3
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
4
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
5
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
6
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
7
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
8
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
9
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
10
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
11
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
12
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
13
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
14
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
15
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
16
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
17
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
18
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
19
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
20
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

'निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न...' रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 2:54 PM

Loktantra Bachao Rally Live: 'EVM मॅनेज केल्याशिवाय, मॅच फिक्सिंग केल्याशिवाय आणि मीडिया मॅनेज केल्याशिवाय 400 पार होऊ शकत नाहीत.'

I.N.D.I.A Rally In Delhi Ramlila Maidan: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDIA आघाडीने रविवारी (31 मार्च) दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर 'लोकशाही वाचवा' (Loktantra Bachao Rally) रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी भाजपवर निवडणुकीत फिक्सिंग केल्याचा आरोप केला.

मॅच फिक्स करण्याचा प्रयत्नयावेळी राहुल गांधी म्हणतात, सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत, तुम्ही मॅच फिक्सिंग बद्दल ऐकले असेलच. अंपायरवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन, कर्णधाराला धमकावून सामना जिंकला जातो, त्याला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग म्हणतात. देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचाची निवड केली आणि सामना सुरू होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करण्यात आले. पीएम मोदी या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करत आहेत.

EVM मॅनेज केलेराहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजप 400 पारचा नारा देत आहे, पण ईव्हीएम मॅनेज केल्याशिवाय, मॅच फिक्सिंग केल्याशिवाय आणि मीडिया-सोशल मीडिया विकत घेतल्याशिवाय 400 पार होऊ शकत नाहीत. यावेळी भाजप 180 चा आकडाही पार करू शकणार नाही. काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती ब्लॉक केली, आमच्या नेत्यांना धमक्या दिल्या जाताहेत. पैसे देऊन सरकार पाडले जात आहे. नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. पीएम मोदी आणि देशातील तीन-चार अब्जाधीश मिळून मॅक्स फिक्स करत आहेत.

संविधान संपवण्यासाठी मॅच फिक्सिंगगरीब जनतेच्या हातून देशाची राज्यघटना हिसकावून घेण्यासाठी मॅच फिक्सिंग केली जात आहे. ज्या दिवशी राज्यघटना संपेल, त्या दिवशी देश टिकणार नाही. संविधान हा देशातील जनतेचा आवाज आहे. ज्या दिवशी राज्यघटना संपेल त्या दिवशी स्वतंत्र राज्ये होतील, हाच भाजपचा उद्देश आहे. संविधानाशिवाय एजन्सींच्या माध्यमातून धाक दाखवून देश चालवता येईल. आमचा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे. संविधान गेले तर गरिबांचे आरक्षण आणि पैसा जाणार.

संबंधित बातमी- 24 तास मोफत वीज, प्रत्येक गावात शाळा-क्लिनिक.., पत्नीने वाचले अरविंद केजरीवालांचे पत्र

नोटाबंदी-जीएसटीचा फायदा कोणत्या गरीबााला झाला? सध्या देशात 40 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी आहे. त्यांना संविधान नष्ट करयचे आहे, कारण त्यांचा उद्देश जनतेचा पैसा हिसकावणे आहे. जातीय जनगणना, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांना एमएसपी हे देशातील सर्वात मोठे प्रश्न आहेत. जनतेने पूर्ण ताकदीनिशी मतदान केले नाही तर मॅच फिक्सिंग यशस्वी होईल. ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. ही निवडणूक देश, राज्यघटना आणि गरीब आणि शेतकऱ्यांचे हक्क वाचवणारी आहे, असंही राहुल यावेळी म्हणाले.

संबंधित बातमी- 'देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल', INDIA आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा BJP वर घणाघात

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी