शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

'निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न...' रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 14:55 IST

Loktantra Bachao Rally Live: 'EVM मॅनेज केल्याशिवाय, मॅच फिक्सिंग केल्याशिवाय आणि मीडिया मॅनेज केल्याशिवाय 400 पार होऊ शकत नाहीत.'

I.N.D.I.A Rally In Delhi Ramlila Maidan: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDIA आघाडीने रविवारी (31 मार्च) दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर 'लोकशाही वाचवा' (Loktantra Bachao Rally) रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी भाजपवर निवडणुकीत फिक्सिंग केल्याचा आरोप केला.

मॅच फिक्स करण्याचा प्रयत्नयावेळी राहुल गांधी म्हणतात, सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत, तुम्ही मॅच फिक्सिंग बद्दल ऐकले असेलच. अंपायरवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन, कर्णधाराला धमकावून सामना जिंकला जातो, त्याला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग म्हणतात. देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचाची निवड केली आणि सामना सुरू होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करण्यात आले. पीएम मोदी या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करत आहेत.

EVM मॅनेज केलेराहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजप 400 पारचा नारा देत आहे, पण ईव्हीएम मॅनेज केल्याशिवाय, मॅच फिक्सिंग केल्याशिवाय आणि मीडिया-सोशल मीडिया विकत घेतल्याशिवाय 400 पार होऊ शकत नाहीत. यावेळी भाजप 180 चा आकडाही पार करू शकणार नाही. काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती ब्लॉक केली, आमच्या नेत्यांना धमक्या दिल्या जाताहेत. पैसे देऊन सरकार पाडले जात आहे. नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. पीएम मोदी आणि देशातील तीन-चार अब्जाधीश मिळून मॅक्स फिक्स करत आहेत.

संविधान संपवण्यासाठी मॅच फिक्सिंगगरीब जनतेच्या हातून देशाची राज्यघटना हिसकावून घेण्यासाठी मॅच फिक्सिंग केली जात आहे. ज्या दिवशी राज्यघटना संपेल, त्या दिवशी देश टिकणार नाही. संविधान हा देशातील जनतेचा आवाज आहे. ज्या दिवशी राज्यघटना संपेल त्या दिवशी स्वतंत्र राज्ये होतील, हाच भाजपचा उद्देश आहे. संविधानाशिवाय एजन्सींच्या माध्यमातून धाक दाखवून देश चालवता येईल. आमचा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे. संविधान गेले तर गरिबांचे आरक्षण आणि पैसा जाणार.

संबंधित बातमी- 24 तास मोफत वीज, प्रत्येक गावात शाळा-क्लिनिक.., पत्नीने वाचले अरविंद केजरीवालांचे पत्र

नोटाबंदी-जीएसटीचा फायदा कोणत्या गरीबााला झाला? सध्या देशात 40 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी आहे. त्यांना संविधान नष्ट करयचे आहे, कारण त्यांचा उद्देश जनतेचा पैसा हिसकावणे आहे. जातीय जनगणना, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांना एमएसपी हे देशातील सर्वात मोठे प्रश्न आहेत. जनतेने पूर्ण ताकदीनिशी मतदान केले नाही तर मॅच फिक्सिंग यशस्वी होईल. ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. ही निवडणूक देश, राज्यघटना आणि गरीब आणि शेतकऱ्यांचे हक्क वाचवणारी आहे, असंही राहुल यावेळी म्हणाले.

संबंधित बातमी- 'देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल', INDIA आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा BJP वर घणाघात

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी