शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

'निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न...' रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 14:55 IST

Loktantra Bachao Rally Live: 'EVM मॅनेज केल्याशिवाय, मॅच फिक्सिंग केल्याशिवाय आणि मीडिया मॅनेज केल्याशिवाय 400 पार होऊ शकत नाहीत.'

I.N.D.I.A Rally In Delhi Ramlila Maidan: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDIA आघाडीने रविवारी (31 मार्च) दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर 'लोकशाही वाचवा' (Loktantra Bachao Rally) रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी भाजपवर निवडणुकीत फिक्सिंग केल्याचा आरोप केला.

मॅच फिक्स करण्याचा प्रयत्नयावेळी राहुल गांधी म्हणतात, सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत, तुम्ही मॅच फिक्सिंग बद्दल ऐकले असेलच. अंपायरवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन, कर्णधाराला धमकावून सामना जिंकला जातो, त्याला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग म्हणतात. देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचाची निवड केली आणि सामना सुरू होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करण्यात आले. पीएम मोदी या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करत आहेत.

EVM मॅनेज केलेराहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजप 400 पारचा नारा देत आहे, पण ईव्हीएम मॅनेज केल्याशिवाय, मॅच फिक्सिंग केल्याशिवाय आणि मीडिया-सोशल मीडिया विकत घेतल्याशिवाय 400 पार होऊ शकत नाहीत. यावेळी भाजप 180 चा आकडाही पार करू शकणार नाही. काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती ब्लॉक केली, आमच्या नेत्यांना धमक्या दिल्या जाताहेत. पैसे देऊन सरकार पाडले जात आहे. नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. पीएम मोदी आणि देशातील तीन-चार अब्जाधीश मिळून मॅक्स फिक्स करत आहेत.

संविधान संपवण्यासाठी मॅच फिक्सिंगगरीब जनतेच्या हातून देशाची राज्यघटना हिसकावून घेण्यासाठी मॅच फिक्सिंग केली जात आहे. ज्या दिवशी राज्यघटना संपेल, त्या दिवशी देश टिकणार नाही. संविधान हा देशातील जनतेचा आवाज आहे. ज्या दिवशी राज्यघटना संपेल त्या दिवशी स्वतंत्र राज्ये होतील, हाच भाजपचा उद्देश आहे. संविधानाशिवाय एजन्सींच्या माध्यमातून धाक दाखवून देश चालवता येईल. आमचा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे. संविधान गेले तर गरिबांचे आरक्षण आणि पैसा जाणार.

संबंधित बातमी- 24 तास मोफत वीज, प्रत्येक गावात शाळा-क्लिनिक.., पत्नीने वाचले अरविंद केजरीवालांचे पत्र

नोटाबंदी-जीएसटीचा फायदा कोणत्या गरीबााला झाला? सध्या देशात 40 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी आहे. त्यांना संविधान नष्ट करयचे आहे, कारण त्यांचा उद्देश जनतेचा पैसा हिसकावणे आहे. जातीय जनगणना, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांना एमएसपी हे देशातील सर्वात मोठे प्रश्न आहेत. जनतेने पूर्ण ताकदीनिशी मतदान केले नाही तर मॅच फिक्सिंग यशस्वी होईल. ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. ही निवडणूक देश, राज्यघटना आणि गरीब आणि शेतकऱ्यांचे हक्क वाचवणारी आहे, असंही राहुल यावेळी म्हणाले.

संबंधित बातमी- 'देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल', INDIA आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा BJP वर घणाघात

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी