शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

मंगळवारी सत्ताधारी-विरोधकांचे 'शक्तीप्रदर्शन', दिल्लीत NDA तर बंगळुरुत विरोधकांची महाबैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 21:01 IST

LokSabha Election: लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

LokSabha Election: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर NDA आणि UPA मध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. उद्याचा दिवस(दि.18) राष्ट्रीय राजकारणासाठी फार महत्वाचा असणार आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत सत्ताधारी एनडीएची बैठक होत आहे, तर दुसरीकडे बंगळुरुमध्ये यूपीएची बैठक होत आहे.

गेल्या महिन्यात बिहारच्या पाटण्यात विरोधी ऐक्याची पहिली बैठक झाली होती. त्या बैठकीत 16 पक्षांची हजेरी लावली होती. आता बंगळुरुच्या दुसऱ्या बैठकीत 24 विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. तर, एनडीएच्या बैठकीत तीसपेक्षा जास्त पक्ष सहभागी होण्याची अपेक्षा आहे. अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे महाराष्ट्रात एनडीएची ताकत वाढणार आहे. याशिवाय, चिराग पासवान, जितनराम मांझी, ओमप्रकाश राजभर, उपेंद्र कुशवाह यांनीही एनडीएक सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. 

पावसाळी अधिवेशनापूर्वी वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न लवकरच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यापूर्वी आपली ताकत दाखवण्यसाठी आणि वातावरण निर्मितीसाठी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपला अद्याप जुने मित्रपक्ष अकाली दल आणि टीडीपी यांना एनडीएमध्ये सामील करुन घेण्यात यश आलेले नाही. टीडीपी आणि अकाली दल एनडीएमध्ये सामील होण्याचे चान्सेस 50-50 आहे. सध्या याबाबत चर्चा सुरू असून, येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट होईल.

काही पक्ष तटस्थ एकीकडे देशाच्या राजकारणात दोन गट स्पष्टपणे दिसत आहेत, तर दुसरीकडे असे काही राजकीय पक्ष आहेत, ज्यांनी अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. ओडिशातील बिजू जनता दल, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेससह अनेक पक्ष आहेत. हे पक्ष ना भाजपमध्ये सामील झाले आहेत ना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी ऐक्यात जात आहेत. लोकसभानिवडणूक जवळ आल्यानंतर यांचीही भूमिका स्पष्ट होईल.

एनडीएच्या बैठकीत 38 पक्ष सहभागी होणार एकीकडे एनडीएच्या केवळ 30 पक्षांची यादी समोर आली असताना, दुसरीकडे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत एनडीएच्या बैठकीत 38 पक्ष सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या नऊ वर्षांत एनडीएचा आलेख वाढला आहे. विकासाचा अजेंडा पुढे नेण्याची लोकांची वाढती इच्छा एनडीएच्या विस्तारास कारणीभूत ठरली आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांत सुशासन मिळाले आहे, असे नड्डा म्हणाले. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी