शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 10:19 IST

नरेंद्र मोदींसोबत निवडणुकीवर जाहीर चर्चेच्या आव्हानावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

Rahul Gandi : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधीक एकमेकांना आव्हान देत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वादविवाद करण्याचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. राहुल गांधी यांनी दोन माजी न्यायमूर्तींनी  दिलेल्या निवडणूक चर्चेचे निमंत्रण स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितलं. यावर भाजपने आता प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात लढण्याची ताकद आहे का? असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विचारला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्राचे निमंत्रण राहुल गांधी यांनी स्वीकारले. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजपने पलटवार केला आहे. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहराही नाहीत, असे भाजपने म्हटले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधी कोण आहेत, ज्यांच्याशी पंतप्रधानांनी चर्चा करावी, असा सवाल केला. तर राहुल गांधी हे काय इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? असा सवाल खासदार स्मृती इराणी यांनी केला आहे.

माजी न्यायाधीश आणि ज्येष्ठ पत्रकार यांनी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून सार्वजनिक मंचावर एकत्र येण्याचे आवाहन केले होते. निष्पक्ष आणि अव्यावसायिक मंचावर जर राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन त्यांची भूमिका मांडली तर सामान्य जनतेला नक्कीच त्याचा लाभ होईल, असे या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी हे आवाहन स्विकारल्याचे जाहीर केले.

"भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत ज्या व्यक्तीमध्ये नाही, त्यांनी बढाई मारणे सोडून द्यावे. दुसरे म्हणजे, ज्याला पंतप्रधान मोदींसोबत बसून वाद घालायचा आहे, मला त्यांना विचारायचे आहे की, ते भारतीय आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का?," असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

"तुमच्या निमंत्रणाबाबत माझी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची चर्चा झाली. अशा चर्चांमधून लोकांना आमच्या ध्येयधोरणाबाबत पक्की कल्पना मिळेल आणि योग्य निर्णय घेण्यासंबंधी त्यांना दिशा ठरवता येईल. तसेच आपापल्या मंचावरून होणारे बिनबुडाचे आरोप टाळण्यासाठीही अशी चर्चा महत्त्वाची आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपा