शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 10:19 IST

नरेंद्र मोदींसोबत निवडणुकीवर जाहीर चर्चेच्या आव्हानावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

Rahul Gandi : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधीक एकमेकांना आव्हान देत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वादविवाद करण्याचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. राहुल गांधी यांनी दोन माजी न्यायमूर्तींनी  दिलेल्या निवडणूक चर्चेचे निमंत्रण स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितलं. यावर भाजपने आता प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात लढण्याची ताकद आहे का? असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विचारला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्राचे निमंत्रण राहुल गांधी यांनी स्वीकारले. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजपने पलटवार केला आहे. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहराही नाहीत, असे भाजपने म्हटले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधी कोण आहेत, ज्यांच्याशी पंतप्रधानांनी चर्चा करावी, असा सवाल केला. तर राहुल गांधी हे काय इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? असा सवाल खासदार स्मृती इराणी यांनी केला आहे.

माजी न्यायाधीश आणि ज्येष्ठ पत्रकार यांनी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून सार्वजनिक मंचावर एकत्र येण्याचे आवाहन केले होते. निष्पक्ष आणि अव्यावसायिक मंचावर जर राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन त्यांची भूमिका मांडली तर सामान्य जनतेला नक्कीच त्याचा लाभ होईल, असे या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी हे आवाहन स्विकारल्याचे जाहीर केले.

"भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत ज्या व्यक्तीमध्ये नाही, त्यांनी बढाई मारणे सोडून द्यावे. दुसरे म्हणजे, ज्याला पंतप्रधान मोदींसोबत बसून वाद घालायचा आहे, मला त्यांना विचारायचे आहे की, ते भारतीय आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का?," असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

"तुमच्या निमंत्रणाबाबत माझी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची चर्चा झाली. अशा चर्चांमधून लोकांना आमच्या ध्येयधोरणाबाबत पक्की कल्पना मिळेल आणि योग्य निर्णय घेण्यासंबंधी त्यांना दिशा ठरवता येईल. तसेच आपापल्या मंचावरून होणारे बिनबुडाचे आरोप टाळण्यासाठीही अशी चर्चा महत्त्वाची आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपा