शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 10:19 IST

नरेंद्र मोदींसोबत निवडणुकीवर जाहीर चर्चेच्या आव्हानावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

Rahul Gandi : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधीक एकमेकांना आव्हान देत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वादविवाद करण्याचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. राहुल गांधी यांनी दोन माजी न्यायमूर्तींनी  दिलेल्या निवडणूक चर्चेचे निमंत्रण स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितलं. यावर भाजपने आता प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात लढण्याची ताकद आहे का? असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विचारला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्राचे निमंत्रण राहुल गांधी यांनी स्वीकारले. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजपने पलटवार केला आहे. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहराही नाहीत, असे भाजपने म्हटले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधी कोण आहेत, ज्यांच्याशी पंतप्रधानांनी चर्चा करावी, असा सवाल केला. तर राहुल गांधी हे काय इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? असा सवाल खासदार स्मृती इराणी यांनी केला आहे.

माजी न्यायाधीश आणि ज्येष्ठ पत्रकार यांनी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून सार्वजनिक मंचावर एकत्र येण्याचे आवाहन केले होते. निष्पक्ष आणि अव्यावसायिक मंचावर जर राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन त्यांची भूमिका मांडली तर सामान्य जनतेला नक्कीच त्याचा लाभ होईल, असे या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी हे आवाहन स्विकारल्याचे जाहीर केले.

"भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत ज्या व्यक्तीमध्ये नाही, त्यांनी बढाई मारणे सोडून द्यावे. दुसरे म्हणजे, ज्याला पंतप्रधान मोदींसोबत बसून वाद घालायचा आहे, मला त्यांना विचारायचे आहे की, ते भारतीय आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का?," असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

"तुमच्या निमंत्रणाबाबत माझी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची चर्चा झाली. अशा चर्चांमधून लोकांना आमच्या ध्येयधोरणाबाबत पक्की कल्पना मिळेल आणि योग्य निर्णय घेण्यासंबंधी त्यांना दिशा ठरवता येईल. तसेच आपापल्या मंचावरून होणारे बिनबुडाचे आरोप टाळण्यासाठीही अशी चर्चा महत्त्वाची आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपा