शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 10:19 IST

नरेंद्र मोदींसोबत निवडणुकीवर जाहीर चर्चेच्या आव्हानावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

Rahul Gandi : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधीक एकमेकांना आव्हान देत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वादविवाद करण्याचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. राहुल गांधी यांनी दोन माजी न्यायमूर्तींनी  दिलेल्या निवडणूक चर्चेचे निमंत्रण स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितलं. यावर भाजपने आता प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात लढण्याची ताकद आहे का? असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विचारला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्राचे निमंत्रण राहुल गांधी यांनी स्वीकारले. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजपने पलटवार केला आहे. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहराही नाहीत, असे भाजपने म्हटले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधी कोण आहेत, ज्यांच्याशी पंतप्रधानांनी चर्चा करावी, असा सवाल केला. तर राहुल गांधी हे काय इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? असा सवाल खासदार स्मृती इराणी यांनी केला आहे.

माजी न्यायाधीश आणि ज्येष्ठ पत्रकार यांनी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून सार्वजनिक मंचावर एकत्र येण्याचे आवाहन केले होते. निष्पक्ष आणि अव्यावसायिक मंचावर जर राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन त्यांची भूमिका मांडली तर सामान्य जनतेला नक्कीच त्याचा लाभ होईल, असे या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी हे आवाहन स्विकारल्याचे जाहीर केले.

"भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत ज्या व्यक्तीमध्ये नाही, त्यांनी बढाई मारणे सोडून द्यावे. दुसरे म्हणजे, ज्याला पंतप्रधान मोदींसोबत बसून वाद घालायचा आहे, मला त्यांना विचारायचे आहे की, ते भारतीय आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का?," असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

"तुमच्या निमंत्रणाबाबत माझी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची चर्चा झाली. अशा चर्चांमधून लोकांना आमच्या ध्येयधोरणाबाबत पक्की कल्पना मिळेल आणि योग्य निर्णय घेण्यासंबंधी त्यांना दिशा ठरवता येईल. तसेच आपापल्या मंचावरून होणारे बिनबुडाचे आरोप टाळण्यासाठीही अशी चर्चा महत्त्वाची आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपा