शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

'खेला होबे'! भाजपाचे ३ खासदार TMC च्या संपर्कात असल्याचा दावा; संख्या २३७ होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 20:07 IST

loksabha Election Result - देशात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले आहेत. मात्र यंदा भाजपाला स्पष्ट बहुमत नसल्याने एनडीएतील घटक पक्षांसोबत मोदींना जुळवून घ्यावं लागणार आहे.

नवी दिल्ली - ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी मोठा दावा केला आहे. भाजपाचे ३ खासदार टीएमसीच्या संपर्कात असून लवकरच भाजपाची लोकसभेतील संख्या २३७ इतकी होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीत भाजपानं २४० जागा जिंकल्या होत्या. टीडीपी आणि जेडीयू या घटक पक्षांसोबत एनडीएनं बहुमत मिळवल्यानं नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. 

यंदाच्या निवडणुकीत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळालं नाही. त्यामुळे जर ३ खासदारांनी वेगळी भूमिका घेतली तर भाजपाचं लोकसभेतील संख्याबळ कमी होऊ शकतं. मात्र टीएमसीनं केलेला दावा चुकीचा असून आमचे सर्व खासदार एकत्र आहेत असं प्रत्युत्तर भाजपानं दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं राज्यातील ४२ पैकी २९ जागांवर विजय मिळवला तर भाजपाची २०१९ संख्या १८ खासदारावरून यंदा १२ खासदार निवडून आलेत. 

टीएमसीचे राज्यसभेचे खासदार साकेत गोखले यांनी म्हटलं की, सध्या भाजपाकडे लोकसभेत २४० जागा आहेत तर इंडिया आघाडीकडे २३७ जागा आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाचे ३ खासदार आमच्या संपर्कात आहेत. लवकरच एक सुखद धक्का मिळेल. यामुळे भाजपाचे संख्याबळ २३७ खासदारांपर्यंत राहील तर इंडिया आघाडीच्या खासदारांची संख्या २४० इतकी होईल असा दावा त्यांनी केला आहे. 

तसेच नरेंद्र मोदी यांनी बनवलेली आघाडी टिकणार नाही. ती जास्त दिवस राहणार नाही असंही त्यांनी सांगितले. अलीकडच्या निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्यात. त्यामुळे बहुमतासाठी लागणाऱ्या २७२ चा आकडा गाठण्यासाठी भाजपाला ३२ खासदारांची गरज आहे. एनडीएच्या घटक पक्षांना सोबत घेत भाजपानं २९३ चा आकडा गाठला आहे. काँग्रेसनं या निवडणुकीत ९९ खासदार जिंकलेत तर २ अपक्ष उमेदवारांनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची संख्या २३६ इतकी झाली आहे.

टीएमसीचा दावा भाजपानं खोडला

तृणमूल काँग्रेस स्वप्नात जगतेय. २०१४ पासून तृणमूल केंद्रात सरकार बनवण्याचं स्वप्न पाहतेय परंतु तिसऱ्यांदा त्यांचं स्वप्न भंगलं आहे. बंगालमधील कुठलाही खासदार टीएमसीच्या संपर्कात नाही. भाजपा खासदार पक्षासोबत एकत्र आहेत असं सांगत टीएमसीने केलेला दावा भाजपा प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी खोडला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाWest Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४