शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

दक्षिणेसह उत्तरेकडे काँग्रेसला चांगल्या निकालाची अपेक्षा; रणनीती यशस्वी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 16:55 IST

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता काही दिवसच शिल्लक आहे. परंतु तत्पूर्वी काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

नवी दिल्ली - गेल्या २ निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला यंदा चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. मागील निवडणुकीत ज्या राज्यात काँग्रेसनं चांगले यश मिळवलं त्या राज्यासह उत्तरेकडील काही राज्यात काँग्रेस मोठी अपेक्षा ठेवून आहे. मागच्या निवडणुकीत उत्तरेकडील राज्यात काँग्रेस केवळ १-२ जागांवर विजयी झाली होती. त्याठिकाणी यंदा जागा वाढतील असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे. राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा त्यामागचं प्रमुख कारण ठरेल असं काँग्रस नेते सांगतात. पण काँग्रेसनं पहिल्यांदाच इतिहासात ३२७ इतक्या कमी जागांवर निवडणूक लढवली आहे.

दक्षिणेकडे काँग्रेस मजबूत

२०१४ मध्ये काँग्रेस प्रणित यूपीए सरकारला देशात उत्तरेकडील राज्यांनी नाकारलं होतं तेव्हा दक्षिणेतील राज्यांनी काँग्रेसची लाज राखली. त्यावेळी ४६४ जागा लढणाऱ्या काँग्रेसला एकूण ४४ जागांवर विजय मिळाला. ज्यात कर्नाटकातील ९ आणि केरळमधील ८ जागांचा समावेश होता. नुकतेच ज्या तेलंगणात काँग्रेसचं सरकार बनलं तिथे केवळ २ जागा पक्षाला जिंकता आल्या होत्या. तर तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पक्षाला खातेही उघडता आलं नाही. 

दुसरीकडे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसनं ४२१ जागांवर निवडणूक लढली. त्यातील ५२ जागा जिंकल्या. तेव्हा कर्नाटकात १ जागेवर तर केरळात १५ जागांवर काँग्रेस विजयी झाली तर आंध्र प्रदेशनं काँग्रेसला पुन्हा निराश केले होते. मागील निवडणुकीत तामिळनाडूत ८, तेलंगणात १ जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला केरळ आणि तामिळनाडू येथे पुन्हा तशीच कामगिरीची अपेक्षा आहे. तर तेलंगणा, कर्नाटक याठिकाणी काँग्रेस सरकार आहे. त्यामुळे या राज्यात काँग्रेसच्या जागा वाढण्याचा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे.

उत्तरेकडे काँग्रेसला आशावाद

काँग्रेसची नजर यावेळी अशा राज्यांवर आहे जिथं मागील निवडणुकीत त्यांना विजयाचं खाते उघडता आले नाही. गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसारख्या राज्यात मागील २ निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला. तर छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश, यूपी आणि महाराष्ट्र याठिकाणी काँग्रेस केवळ १-२ जागांवर जिंकली. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांकडून काँग्रेसला मोठी अपेक्षा आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस यंदा चांगली कामगिरी करेल असं मानलं जातं. त्याचप्रमाणे गुजरात, हरियाणा, राजस्थानात पक्षाचे उमेदवार जिंकू शकतात असं नेत्यांना वाटतं. हरियाणात शेतकरी नाराजी, महिला पैलवानांमधील असंतोष, जातीय समीकरणे यातून सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी आहे. उत्तर  प्रदेशात यंदा समाजवादी पक्षासोबत काँग्रेस रिंगणात आहे. बिहारमध्ये आरजेडीसोबत काँग्रेसनं आघाडी केली आहे. झारखंडमध्येही हेमंत सोरेन यांच्या अटकेची सहानुभूती आघाडीला मिळेल असं काँग्रेसला वाटतं. 

काँग्रेसची रणनीती यशस्वी होणार?

काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. त्यामागे खास रणनीती आहे. याच रणनीतीतून काँग्रेसनं संपूर्ण निवडणूक लढवली. महागाई, बेरोजगारी, संविधान वाचवण्याची लढाई यासारख्या मुद्द्यावर जनतेत जात लोकांशी निगडीत मुद्द्यापासून प्रचार कुठेही भरकटला जाऊ नये यासाठी काँग्रेसनं काळजी घेतली. यंदा काँग्रेसनं अजेंडा सेट केला होता. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षांवर आक्रमक प्रचार सुरू होता. काँग्रेसनं प्रसिद्ध केलेला जाहिरनामा आणि त्यातील ५ सामाजिक न्याय आणि २५ गॅरंटी यावरून ते जनतेत गेले. त्यामुळे काँग्रेसला आत्मविश्वास वाढला आहे. आता त्यांची ही रणनीती कितपत यशस्वी होणार हे ४ जूनच्या निकालातून स्पष्ट होईल. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा