शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेसह उत्तरेकडे काँग्रेसला चांगल्या निकालाची अपेक्षा; रणनीती यशस्वी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 16:55 IST

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता काही दिवसच शिल्लक आहे. परंतु तत्पूर्वी काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

नवी दिल्ली - गेल्या २ निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला यंदा चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. मागील निवडणुकीत ज्या राज्यात काँग्रेसनं चांगले यश मिळवलं त्या राज्यासह उत्तरेकडील काही राज्यात काँग्रेस मोठी अपेक्षा ठेवून आहे. मागच्या निवडणुकीत उत्तरेकडील राज्यात काँग्रेस केवळ १-२ जागांवर विजयी झाली होती. त्याठिकाणी यंदा जागा वाढतील असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे. राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा त्यामागचं प्रमुख कारण ठरेल असं काँग्रस नेते सांगतात. पण काँग्रेसनं पहिल्यांदाच इतिहासात ३२७ इतक्या कमी जागांवर निवडणूक लढवली आहे.

दक्षिणेकडे काँग्रेस मजबूत

२०१४ मध्ये काँग्रेस प्रणित यूपीए सरकारला देशात उत्तरेकडील राज्यांनी नाकारलं होतं तेव्हा दक्षिणेतील राज्यांनी काँग्रेसची लाज राखली. त्यावेळी ४६४ जागा लढणाऱ्या काँग्रेसला एकूण ४४ जागांवर विजय मिळाला. ज्यात कर्नाटकातील ९ आणि केरळमधील ८ जागांचा समावेश होता. नुकतेच ज्या तेलंगणात काँग्रेसचं सरकार बनलं तिथे केवळ २ जागा पक्षाला जिंकता आल्या होत्या. तर तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पक्षाला खातेही उघडता आलं नाही. 

दुसरीकडे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसनं ४२१ जागांवर निवडणूक लढली. त्यातील ५२ जागा जिंकल्या. तेव्हा कर्नाटकात १ जागेवर तर केरळात १५ जागांवर काँग्रेस विजयी झाली तर आंध्र प्रदेशनं काँग्रेसला पुन्हा निराश केले होते. मागील निवडणुकीत तामिळनाडूत ८, तेलंगणात १ जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला केरळ आणि तामिळनाडू येथे पुन्हा तशीच कामगिरीची अपेक्षा आहे. तर तेलंगणा, कर्नाटक याठिकाणी काँग्रेस सरकार आहे. त्यामुळे या राज्यात काँग्रेसच्या जागा वाढण्याचा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे.

उत्तरेकडे काँग्रेसला आशावाद

काँग्रेसची नजर यावेळी अशा राज्यांवर आहे जिथं मागील निवडणुकीत त्यांना विजयाचं खाते उघडता आले नाही. गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसारख्या राज्यात मागील २ निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला. तर छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश, यूपी आणि महाराष्ट्र याठिकाणी काँग्रेस केवळ १-२ जागांवर जिंकली. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांकडून काँग्रेसला मोठी अपेक्षा आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस यंदा चांगली कामगिरी करेल असं मानलं जातं. त्याचप्रमाणे गुजरात, हरियाणा, राजस्थानात पक्षाचे उमेदवार जिंकू शकतात असं नेत्यांना वाटतं. हरियाणात शेतकरी नाराजी, महिला पैलवानांमधील असंतोष, जातीय समीकरणे यातून सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी आहे. उत्तर  प्रदेशात यंदा समाजवादी पक्षासोबत काँग्रेस रिंगणात आहे. बिहारमध्ये आरजेडीसोबत काँग्रेसनं आघाडी केली आहे. झारखंडमध्येही हेमंत सोरेन यांच्या अटकेची सहानुभूती आघाडीला मिळेल असं काँग्रेसला वाटतं. 

काँग्रेसची रणनीती यशस्वी होणार?

काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. त्यामागे खास रणनीती आहे. याच रणनीतीतून काँग्रेसनं संपूर्ण निवडणूक लढवली. महागाई, बेरोजगारी, संविधान वाचवण्याची लढाई यासारख्या मुद्द्यावर जनतेत जात लोकांशी निगडीत मुद्द्यापासून प्रचार कुठेही भरकटला जाऊ नये यासाठी काँग्रेसनं काळजी घेतली. यंदा काँग्रेसनं अजेंडा सेट केला होता. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षांवर आक्रमक प्रचार सुरू होता. काँग्रेसनं प्रसिद्ध केलेला जाहिरनामा आणि त्यातील ५ सामाजिक न्याय आणि २५ गॅरंटी यावरून ते जनतेत गेले. त्यामुळे काँग्रेसला आत्मविश्वास वाढला आहे. आता त्यांची ही रणनीती कितपत यशस्वी होणार हे ४ जूनच्या निकालातून स्पष्ट होईल. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा