शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

यूपी-दिल्लीचे जागावाटप ठरले, पण महाराष्ट्र अन् पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससमोर मोठा पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 13:50 IST

बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिला आहे, तर महाराष्ट्रातही अद्याप काही निर्णय होऊ शकलेला नाही.

LokSabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधआरी भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. याच दिशेने काँग्रेस एक-एक पक्षाला सोबत आणण्याचा प्रयत्न करत आहे. समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यात काँग्रेसला यश आले, पण त्यांच्या अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसला मोठी कसरत करावी लागत आहे.

पश्चिम बंगालमध्ये वाद...पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे मन वळवण्यात काँग्रेसला यश आले नाही. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये TMC प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला होता, त्यामुळए काँग्रेसच्या अडचणी वाढत आहेत. असे मानले जाते की, काँग्रेसने टीएमसीकडे सुमारे 10 जागा मागितल्या होत्या, परंतु ममता फक्त दोन जागा देण्यास तयार आहेत. अद्याप जागांबाबत एकमत झालेले नाही. अधीर रंजन सातत्याने टीएमसीवर निशाणा साधत आहेत, त्यामुळेही जागावाटपाबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. या वादामुळे ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला हजेरी लावली नव्हती. अशातच काँग्रेस ममता बॅनर्जींची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. 

महाराष्ट्राची काय आहे परिस्थिती..?महाराष्ट्रातही महाविकासआघाडीने अद्याप जागावाटपाचा आराखडा जाहीर केलेला नाही. काँग्रेस, शिवसेना (बाळासाहेब उद्धव ठाकरे) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी यांच्यात चर्चा अंतिम टप्प्यात आहे. जागांच्या गोंधळावर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंशीही चर्चा केली असून, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभेच्या सहापैकी तीन जागांवर काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे, तर उद्धव ठाकरेंना मुंबईसह लोकसभेच्या 18 जागांवर निवडणूक लढवायची आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय होणऊ शकतो. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे