शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांबाबत आयोगाला सूचना करणे आमचे काम नाही; EVM-व्हीव्हीपॅटवरील निकाल राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 06:46 IST

मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात काही दिवसांचा विलंब लागणार असला तरी निःपक्षता आणि पारदर्शता कायम राखण्यासाठी तो समर्थनीय असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हणणे आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोग ही संवैधानिक संस्था आहे. त्यामुळे निवडणुकांवर नियंत्रण ठेवणे वा त्या कशा घ्याव्यात हे आयोगाला सांगणे हे आमचे काम नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरणाचा निकाल बुधवारी राखून ठेवला. तत्पूर्वी न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून चार मुद्यांविषयी स्पष्टीकरण मागवून शंकांचे निराकरण करून घेतले.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने १८ एप्रिल रोजी या प्रकरणी सुनावणी पूर्ण केली होती. निकाल देण्यापूर्वी काही मुद्यांवरील स्पष्टीकरण हवे असल्यामुळे आज सुनावणी ठेवण्यात आली. त्या संबंधात उत्तरे मिळाली असून निकाल सुरक्षित ठेवण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. शंभर टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी याचिकाकर्ते  एडीआर, अभय छाजेड व अरुणकुमार अग्रवाल यांनी केली आहे. मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात काही दिवसांचा विलंब लागणार असला तरी निःपक्षता आणि पारदर्शता कायम राखण्यासाठी तो समर्थनीय असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हणणे आहे.

तुमचा पूर्वग्रह असेल तर...जर एखाद्या विषयावर तुमचा पूर्वग्रहच असेल, तर आम्ही तुम्हाला त्यात मदत करू शकत नाही. एवढेच नव्हे तर तुमची विचार करण्याची पद्धत बदलू शकत नाही, असे खंडपीठाने भूषण यांना म्हटले. तसेच ज्या अहवालाच्या आधारे तुम्ही बोलत आहात, त्यात आतापर्यंत ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याची एकही घटना घडली नसल्याचे म्हटले आहे. जर काही गडबड झाल्यास, त्यावर कायदेशीर कारवाई होईलच, असे न्या. दीपंकर दत्ता म्हणाले.

निवडणूक आयोग काय म्हणाले? 

ईव्हीएममधील मते ४५ दिवस सुरक्षित ठेवली जातात. ४६ व्या दिवशी कोणी याचिका दाखल केल्यास, संबंधित न्यायालयाच्या रजिस्ट्रारला पत्र पाठविले जाते, तोपर्यंत मशीन सुरक्षित असते. आयोगाकडे इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशनचे १४०० तर भेलचे ३४०० सिम्बॉल लोडिंग युनिट्स आहेत. सीयू, बीयू आणि व्हीव्हीपॅट या तिन्हीमध्ये मायक्रो कंट्रोलर चीप असतात. त्यात एकदाच प्रोग्रामिंग केले जाते, त्यामुळे ते पुन्हा बदलता येणे शक्य नाही. मतदानानंतर सीयू, बीयू आणि व्हीव्हीपॅट सील केली जातात. त्यात हस्तक्षेप करता येत नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

याचिकाकर्त्यांनी कोणत्या शंका उपस्थित केल्या? 

ईव्हीएममध्ये गैरप्रकार करण्यासाठी विविध सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. ईव्हीएममधील प्रोसेसर चीप एकदाच प्रोग्रामेबल असते. ती एकदा सेट केल्यास त्यानंतर त्यात बदल होतो का, याविषयी शंका आहे.  प्रत्येक उमेदवारासाठी ईव्हीएममध्ये विशेष बार कोड देण्यात यावा.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEVM Machineएव्हीएम मशीनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग