शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

निवडणुकांबाबत आयोगाला सूचना करणे आमचे काम नाही; EVM-व्हीव्हीपॅटवरील निकाल राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 06:46 IST

मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात काही दिवसांचा विलंब लागणार असला तरी निःपक्षता आणि पारदर्शता कायम राखण्यासाठी तो समर्थनीय असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हणणे आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोग ही संवैधानिक संस्था आहे. त्यामुळे निवडणुकांवर नियंत्रण ठेवणे वा त्या कशा घ्याव्यात हे आयोगाला सांगणे हे आमचे काम नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरणाचा निकाल बुधवारी राखून ठेवला. तत्पूर्वी न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून चार मुद्यांविषयी स्पष्टीकरण मागवून शंकांचे निराकरण करून घेतले.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने १८ एप्रिल रोजी या प्रकरणी सुनावणी पूर्ण केली होती. निकाल देण्यापूर्वी काही मुद्यांवरील स्पष्टीकरण हवे असल्यामुळे आज सुनावणी ठेवण्यात आली. त्या संबंधात उत्तरे मिळाली असून निकाल सुरक्षित ठेवण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. शंभर टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी याचिकाकर्ते  एडीआर, अभय छाजेड व अरुणकुमार अग्रवाल यांनी केली आहे. मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात काही दिवसांचा विलंब लागणार असला तरी निःपक्षता आणि पारदर्शता कायम राखण्यासाठी तो समर्थनीय असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हणणे आहे.

तुमचा पूर्वग्रह असेल तर...जर एखाद्या विषयावर तुमचा पूर्वग्रहच असेल, तर आम्ही तुम्हाला त्यात मदत करू शकत नाही. एवढेच नव्हे तर तुमची विचार करण्याची पद्धत बदलू शकत नाही, असे खंडपीठाने भूषण यांना म्हटले. तसेच ज्या अहवालाच्या आधारे तुम्ही बोलत आहात, त्यात आतापर्यंत ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याची एकही घटना घडली नसल्याचे म्हटले आहे. जर काही गडबड झाल्यास, त्यावर कायदेशीर कारवाई होईलच, असे न्या. दीपंकर दत्ता म्हणाले.

निवडणूक आयोग काय म्हणाले? 

ईव्हीएममधील मते ४५ दिवस सुरक्षित ठेवली जातात. ४६ व्या दिवशी कोणी याचिका दाखल केल्यास, संबंधित न्यायालयाच्या रजिस्ट्रारला पत्र पाठविले जाते, तोपर्यंत मशीन सुरक्षित असते. आयोगाकडे इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशनचे १४०० तर भेलचे ३४०० सिम्बॉल लोडिंग युनिट्स आहेत. सीयू, बीयू आणि व्हीव्हीपॅट या तिन्हीमध्ये मायक्रो कंट्रोलर चीप असतात. त्यात एकदाच प्रोग्रामिंग केले जाते, त्यामुळे ते पुन्हा बदलता येणे शक्य नाही. मतदानानंतर सीयू, बीयू आणि व्हीव्हीपॅट सील केली जातात. त्यात हस्तक्षेप करता येत नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

याचिकाकर्त्यांनी कोणत्या शंका उपस्थित केल्या? 

ईव्हीएममध्ये गैरप्रकार करण्यासाठी विविध सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. ईव्हीएममधील प्रोसेसर चीप एकदाच प्रोग्रामेबल असते. ती एकदा सेट केल्यास त्यानंतर त्यात बदल होतो का, याविषयी शंका आहे.  प्रत्येक उमेदवारासाठी ईव्हीएममध्ये विशेष बार कोड देण्यात यावा.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEVM Machineएव्हीएम मशीनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग