शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कैरानाचा धडा; ऊस उत्पादकांच्या मतांसाठी मोदींनी लगावला 'हा' मास्टरट्रोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 17:06 IST

ऊस उत्पादकांची नाराजी दूर करण्यासाठी मोदी सरकार कामाला लागलं

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कैराना आणि नुरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला ऊस उत्पादकांच्या नाराजीचा फटका बसला होता. ऊस उत्पादकांची हीच नाराजी कायम राहिल्यास त्याचे परिणाम 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशात सहन करावे लागू शकतात. त्यामुळेच कैराना आणि नुरपूरमधील पराभवातून धडा घेत मोदी सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाछी प्रयत्न सुरू केले आहेत. 2014 प्रमाणेच 2019 मध्येही उत्तर प्रदेशात कमळ फुलवण्यासाठी मोदी सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांची 20 हजार कोटी रुपयांची देणी फेडणार असल्याचा निर्णय सरकारनं जाहीर केला आहे. यासोबतच साखरेवरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं 30 लाख टनांचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. कैरानात भाजपाला पराभव पत्करावा लागल्यानं मोदी सरकारनं हा निर्णयांचा धडका लावला असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान संघर्ष समितीनं दिली आहे. उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठं ऊस उत्पादक राज्य आहे. पश्चिम आणि मध्य उत्तर प्रदेशात सर्वाधिक ऊस उत्पादन होतं. पश्चिम उत्तर प्रदेशाला तर ऊसाचं कोठार समजलं जातं. बागपत, कैराना, मुझफ्फरनगर, सहारनपूर, बिजनोर, मेरठ, मुरादाबाद, गाझियाबाद, अमरोहा, अलिगढ, लखीमपूर खिरी, सीतापूर, शाहजहापूर, बाराबंकी,  फैजाबाद, गोरखपूर, कुशीनगर, महाराजगंज, देवरिया, बलिया आणि मऊसह जवळपास 40 लोकसभा मतदारसंघात ऊसाचा प्रश्न महत्त्वाचा ठरु शकतो. त्यामुळेच ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सध्या सरकारकडून सुरू आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९kairanaकैरानाUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा