शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

Lokmat Parliamentary Awards: खराब अर्थव्यवस्था वारशानं मिळालीय; गोयल यांचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 21:17 IST

काँग्रेससोबत शिवसेनेदेखील घणाघाती टीका

नवी दिल्ली: आम्हाला खराब अर्थव्यवस्था वारशानं मिळाली. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य उज्ज्वल असल्याचं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यावर भाष्य करताना देशाच्या अर्थव्यवस्थेला लवकरच अच्छे दिन येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या जीडीपी वाढीचा दर सातत्यानं घसरत आहे. त्याबद्दल पीयूष गोयल यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना गोयल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. 2014 मध्ये आम्ही सत्तेत आलो. तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट स्थितीत होती. अडचणीत असलेली अर्थव्यवस्था आम्हाला वारशानं मिळाली आहे. अर्थव्यवस्था सक्षम करण्याचं काम आम्ही केलं असून आज भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढते आहे, असं गोयल यांनी सांगितलं. रेल्वेची अवस्था अतिशय बिकट असल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. त्यावरही गोयल यांनी भाष्य केलं. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानं रेल्वेवर 22 हजार कोटींचा बोजा पडला आहे. प्रवाशांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेत केली जाणारी गुंतवणूक दीडपटीनं वाढली आहे. मोफत वायफाय सेवा दिली जात आहे. याशिवाय सुरक्षेवर केला जाणारा खर्चदेखील वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.  

पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रात झालेल्या घडामोडींवरुन शिवसेनेला धारेवर धरलं. आम्ही युती म्हणून लढलेल्या 288 पैकी 164 जागा जिंकलो. भाजपानं 164 जागा लढवून 105 जागांवर विजय मिळवला. याचा अर्थ आम्ही लढवलेल्या 65 ते 70 टक्के जागा जिंकल्या. जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला. पण शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली. युतीचा धर्म पाळला नाही. जर भाजपानं महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवल्या असत्या, तर आमचं सरकार नक्कीच आलं असतं. शिवसेना शत्रूच्या गोटात जाऊन सामील झाली. शिवसेनेनं सर्वच सिद्धांत मोडीत काढले. शिवसेना कालपर्यंत ज्यांच्यावर टीका करत होती, त्यांच्यासोबतच जाऊन बसली आहे, अशी घणाघाती टीका गोयल यांनी केली.

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डpiyush goyalपीयुष गोयलcongressकाँग्रेस