शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Awards: खराब अर्थव्यवस्था वारशानं मिळालीय; गोयल यांचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 21:17 IST

काँग्रेससोबत शिवसेनेदेखील घणाघाती टीका

नवी दिल्ली: आम्हाला खराब अर्थव्यवस्था वारशानं मिळाली. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य उज्ज्वल असल्याचं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यावर भाष्य करताना देशाच्या अर्थव्यवस्थेला लवकरच अच्छे दिन येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या जीडीपी वाढीचा दर सातत्यानं घसरत आहे. त्याबद्दल पीयूष गोयल यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना गोयल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. 2014 मध्ये आम्ही सत्तेत आलो. तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट स्थितीत होती. अडचणीत असलेली अर्थव्यवस्था आम्हाला वारशानं मिळाली आहे. अर्थव्यवस्था सक्षम करण्याचं काम आम्ही केलं असून आज भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढते आहे, असं गोयल यांनी सांगितलं. रेल्वेची अवस्था अतिशय बिकट असल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. त्यावरही गोयल यांनी भाष्य केलं. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानं रेल्वेवर 22 हजार कोटींचा बोजा पडला आहे. प्रवाशांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेत केली जाणारी गुंतवणूक दीडपटीनं वाढली आहे. मोफत वायफाय सेवा दिली जात आहे. याशिवाय सुरक्षेवर केला जाणारा खर्चदेखील वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.  

पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रात झालेल्या घडामोडींवरुन शिवसेनेला धारेवर धरलं. आम्ही युती म्हणून लढलेल्या 288 पैकी 164 जागा जिंकलो. भाजपानं 164 जागा लढवून 105 जागांवर विजय मिळवला. याचा अर्थ आम्ही लढवलेल्या 65 ते 70 टक्के जागा जिंकल्या. जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला. पण शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली. युतीचा धर्म पाळला नाही. जर भाजपानं महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवल्या असत्या, तर आमचं सरकार नक्कीच आलं असतं. शिवसेना शत्रूच्या गोटात जाऊन सामील झाली. शिवसेनेनं सर्वच सिद्धांत मोडीत काढले. शिवसेना कालपर्यंत ज्यांच्यावर टीका करत होती, त्यांच्यासोबतच जाऊन बसली आहे, अशी घणाघाती टीका गोयल यांनी केली.

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डpiyush goyalपीयुष गोयलcongressकाँग्रेस