शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Lokmat National Conclave: भारताच्या न्यायव्यवस्थेवर शंका घेणाऱ्या राहुल गांधींवर किरेन रिजीजूंचं टीकास्त्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 15:17 IST

Lokmat Parliamentary Awards : भारताची न्यायपालिका ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. जागतिक पातळीवर भारताच्या न्यायपालिकेचा आदराने उल्लेख केला जातो, असं रिजिजू यांनी ठणकावून सांगितलं आहे

नवी दिल्ली - भारतातील घटनात्मक संस्थांवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कब्जा केला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर भारतात मोठा राजकीय वाद पेटला आहे. तसेच त्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, भारतातील न्यायव्यवस्थेवर शंका घेणाऱ्या राहुल गांधींवर केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी टीका केली आहे. तसेच भारताची न्यायपालिका ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. जागतिक पातळीवर भारताच्या न्यायपालिकेचा आदराने उल्लेख केला जातो, असं रिजिजू यांनी ठणकावून सांगितलं आहे.

भारतातील न्यायव्यवस्थेसह सर्व घटनात्मक संस्थावर कब्जा केला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.  त्यावर उत्तर देताना किरेन रिजीजू म्हणाले की, खरं तर राहुल गांधी जे काही बोलले त्याबाबत प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. मात्र देशातून आणि देशाबाहेरून ज्याप्रकारे सामुहिक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ही बाब गंभीर बनली आहे. या माध्यमातून भारतातील लोकशाही आणि न्यायव्यवस्था यांची प्रतिमा भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या लोकांकडून सरकार काही प्रकरणांमध्ये न्यायपालिकेत हस्तक्षेप करण्याचा आणि न्यायव्यवस्थेवर अंकुश ठेवत आहे, असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय न्यायव्यवस्था ही कॉम्प्रमाईज करते, सरकार न्यायपालिकेवर नियंत्रण आणू इच्छितेय असं म्हणताहेत, ते भारतीय न्यायव्यवस्थेला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण भारताची न्यायपालिका ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. जागतिक पातळीवर भारताच्या न्यायपालिकेचा आदराने उल्लेख केला जातो.

भारतीय न्यायपालिकेवर हल्ला करून, न्यायव्यवस्थेला कमी लेखून आपल्या व्यवस्थेला दुबळे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी एक डिझाइन तयार करण्यात आलं आहे. मला सर्व माहिती आहे. पण मी इथे सर्व काही बोलू शकत नाही, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.   

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा