शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Lokmat National Conclave: भारताच्या न्यायव्यवस्थेवर शंका घेणाऱ्या राहुल गांधींवर किरेन रिजीजूंचं टीकास्त्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 15:17 IST

Lokmat Parliamentary Awards : भारताची न्यायपालिका ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. जागतिक पातळीवर भारताच्या न्यायपालिकेचा आदराने उल्लेख केला जातो, असं रिजिजू यांनी ठणकावून सांगितलं आहे

नवी दिल्ली - भारतातील घटनात्मक संस्थांवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कब्जा केला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर भारतात मोठा राजकीय वाद पेटला आहे. तसेच त्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, भारतातील न्यायव्यवस्थेवर शंका घेणाऱ्या राहुल गांधींवर केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी टीका केली आहे. तसेच भारताची न्यायपालिका ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. जागतिक पातळीवर भारताच्या न्यायपालिकेचा आदराने उल्लेख केला जातो, असं रिजिजू यांनी ठणकावून सांगितलं आहे.

भारतातील न्यायव्यवस्थेसह सर्व घटनात्मक संस्थावर कब्जा केला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.  त्यावर उत्तर देताना किरेन रिजीजू म्हणाले की, खरं तर राहुल गांधी जे काही बोलले त्याबाबत प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. मात्र देशातून आणि देशाबाहेरून ज्याप्रकारे सामुहिक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ही बाब गंभीर बनली आहे. या माध्यमातून भारतातील लोकशाही आणि न्यायव्यवस्था यांची प्रतिमा भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या लोकांकडून सरकार काही प्रकरणांमध्ये न्यायपालिकेत हस्तक्षेप करण्याचा आणि न्यायव्यवस्थेवर अंकुश ठेवत आहे, असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय न्यायव्यवस्था ही कॉम्प्रमाईज करते, सरकार न्यायपालिकेवर नियंत्रण आणू इच्छितेय असं म्हणताहेत, ते भारतीय न्यायव्यवस्थेला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण भारताची न्यायपालिका ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. जागतिक पातळीवर भारताच्या न्यायपालिकेचा आदराने उल्लेख केला जातो.

भारतीय न्यायपालिकेवर हल्ला करून, न्यायव्यवस्थेला कमी लेखून आपल्या व्यवस्थेला दुबळे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी एक डिझाइन तयार करण्यात आलं आहे. मला सर्व माहिती आहे. पण मी इथे सर्व काही बोलू शकत नाही, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.   

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा